नवी दिल्ली, ३१ मे | कोरोनाच्या महासाथीचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या GDP’मध्ये ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. मागील वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली.

२०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थव्यस्थेत सकारात्मक सुधारणा होतील अशी अपेक्षा होती. आर्थिक वर्ष २०१९ देशाचा जीडीपी वाढीचा दर ४ टक्के इतका होता. परंतु तो गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत कमी होता. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रावर झालेल्या परिणामाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता.

१९८०-८१ नंतर पहिल्यांदा अर्थव्यवस्थेला इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये वाढीऐवजी घसरण झाली आहे. कोळसा, क्रुड, नॅचरल गॅस, रिफायनसी प्रोडक्ट, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट, वीज या क्षेत्रांच्या वाढीचा दर मार्चमधील ११.४५ टक्क्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात ५६.१ टक्के झाला. नॅचरल गॅस, स्टीलस सिमेंट आणि वीज क्षेत्रात कामगिरी उत्तम राहिली आहे.

 

News English Summary: Corona’s superpower has hit the country’s economy hard. The Indian economy has been hit hardest in the last 40 years, with India’s GDP shrinking by 7.3 per cent in FY2021. In the fourth quarter of last year, however, GDP grew by 1.6 per cent.

News English Title: GDP percent down in FY21 to four decade low coronavirus Effect news updates.

मोदी है तो मुमकिन है | अर्थव्यवस्थेला ४० वर्षांतील मोठा फटका | GDP ७.३ टक्क्यांनी घसरला