मुंबई : मुंबई बेस्ट कामगारांचा संप टळण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका कुचकामी ठरल्या आहेत. दरम्यान, सामान्यांचे हाल टाळण्यासाठी आणि संप मोडून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक कोर्टातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच थेट कायदेशीर आव्हान दिले. त्यामुळे संतप्त झालेले बेस्ट कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
नेमक्या काय मागण्या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या?
- सुधारित वेतन करार
- दिवाळीचा बाेनस
- कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे
- बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण
