27 April 2024 5:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोनावर नियंत्रण येईपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल | मुलांवर काम किंवा भीक मागण्याची वेळ येईल

Raghuram Rajan, GDP Numbers, Indian Economy, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर : देशाचा GDP उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरल्यानं चिंता वाढली आहे. त्यातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी वाईट होईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक फटका बसेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. कोरोनामुळे या दोन्ही देशांना खूप मोठा फटका बसला आहे.

रघुराम राजन यांनी त्यांच्या लिंक्डइन पेजवर एक पोस्ट लिहिली आहे. अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रांचा जीडीपी जाहीर झाला आहे. अजून काही क्षेत्रांचा जीडीपी जाहीर व्हायचा आहे. तो जाहीर झाल्यावर देशाच्या जीडीपीची अवस्था आणखी बिकट होईल, अशी भीती राजन यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जात नाही, तोपर्यंत फारसा खर्च करता येणार नाही, असं यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी अर्थव्यवस्थेची तुलना रुग्णाशी करून परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ‘अर्थव्यवस्था एखादा रुग्ण असल्याची कल्पना केल्यास तर त्या रुग्णाला सातत्यानं उपचारांची आवश्यकता आहे. दिलासा न मिळाल्यास लोकांवर उपाशी राहण्याची वेळ येईल. ते मुलांना शिकवू शकणार नाहीत. मुलांवर काम करण्याची किंवा भीक मागण्याची वेळ येईल. कर्जासाठी लोकांना त्यांच्याकडे असणारं सोनं गहाण ठेवावं लागेल. ईएमआय, घरभाडं देणं कठीण होईल. लहान कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकणार नाहीत. त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत जाईल आणि त्या बंद होतील. अशा प्रकारे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवेपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असेल,’ असं राजन यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दुसरीकडे, २१ व्या शतकातल्या भारताची वाटचाल ही एका नॉलेज इकॉनॉमीच्या दिशेने होते आहे. नव्या शिक्षण धोरणात आपण सामान्य कुटुंबांमधील युवक कसे पुढे येतील यावर भर दिला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जगाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर नोकऱ्या, कामाचं स्वरुप यामध्ये होणाऱ्या बदलांची चर्चा होते आहे. अशात कौशल्य आणि ज्ञान यावर आधारित शिक्षण धोरण असणं हे अत्यावश्यक आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रीय शिक्षण धोरणा संदर्भातल्या परिषदेला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते.

नव्या शिक्षण धोरणाचं महत्त्व यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशद केलं. ते म्हणाले नवं शिक्षण धोरण हे स्टडिंग ऐवजी लर्निंगवर फोकस करणारं आहे. तसंच अभ्यासक्रमापेक्षाही या धोरणात आव्हानात्मक विचारांना प्राधान्य देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर विविध भाषांवरही भर देण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान कसं प्राप्त होईल यावर नव्या शिक्षण धोरणात भर देण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

News English Summary: Former Reserve Bank of India (RBI) Governor Raghuram Rajan has said the government will have to expand its resources in every way possible, spending as cleverly as possible to bring the economy back to pre-pandemic GDP levels. Rajan, in his LinkedIn post published on Sunday, stated that the Centre has “to take every action that can move the economy forward without additional spending.”

News English Title: Need To Be Frightened Out Of Complacency says Raghuram Rajan On GDP Numbers Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Raghuram Rajan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x