महत्वाच्या बातम्या
-
इंद्रा नुयी 'पेप्सिको'च्या सीईओ'पदाचा राजीनामा देणार
तब्बल बारा वर्षांच्या सेवेनंतर पेप्सिको’च्या सीईओ इंद्रा नुयी पदाचा राजीनामा देणार आहेत. त्या ३ ऑक्टोबर रोजीी पदावरुन पायउतार होतील असं समजतं, परंतु त्यांच्या राजीनाम्यामुळे बिझनेस वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुम्ही बँकेत किमान रक्कम न ठेवल्याने बँका मात्र मालामाल
तुम्ही तुमच्या बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नसेल कदाचित, परंतु त्यामुळे ग्राहकाला जरी दंड बसला असेल तरी बँकांची मात्र तुफान चांदी झाल्याचे समजते. कारण किमान रक्कम न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून बँकांनी दंडापोटी तब्बल ५,००० कोटी रुपयांची रक्कम वसूल केली आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी बँक खात्यात आवश्यक रकमेपेक्षाही कमी पैसे ठेवणाऱ्या ग्राहकांकडून हा मोठा दंड वसूल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘डी’कोल्ड व सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर लवकरच बंदी?
‘डी’कोल्ड आणि सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेदनाशामक तसेच फ्लू’शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ही औषधे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘आज की बड़ी खबर' मोदींचा VIDEO: पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी'ला मोदी 'मेहुल भाई' बोलले होते
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘‘आज की बड़ी खबर” असं ट्विट करून २०१५ मधील एक विडिओ प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका कार्यक्रमात १३,००० कोटीच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी’ला ‘मेहुल भाई’ बोलले होते असा तो विडिओ आहे.
5 वर्षांपूर्वी -
एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी ‘अॅपल’ जगातील पहिली कंपनी बनली आहे
आयफोन बनविणारी कंपनी ‘अॅपल’ एक ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल असणारी जगातील पहिली कंपनी बनली आहे. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा जागतिक दर्जाचा मान प्राप्त केला आहे. अॅपल’नंतर बाजार भांडवलाच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो तो अॅमेझॉनचा आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे गुगलची ‘अल्फाबेट’ कंपनी आणि या तिन्ही कंपन्या अमेरिकन आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी जगभ्रमंती करणारे आजवरचे सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत
मोदींच्या जगभ्रमंतीवर ४ वर्षात तब्बल १४८४ कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच त्यांनी ४ वर्षात १७१ दिवस म्हणजे एकूण १२ टक्के वेळ परदेश वास्तव्यात गेला आहे. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सत्ताकाळात म्हणजे एकूण ९ वर्षात परदेशवारीवर केवळ ६४२ कोटी रुपये खर्च झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या अजून एका पाठपुराव्याला यश, सॅनिटरी नॅपकिन्स करमुक्त झाल्याने स्त्रीवर्गाला फायदा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी कौन्सिलने सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीत महत्वाचा निर्णय घेतल्याने समस्त स्त्री वर्गाला त्याचा फायदा होणार आहे. शालिनी ठाकरे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री मुनगंटीवार आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन या करमुक्तीची लेखी सूचना आणि विनंती केली होती, ज्याला आज यश मिळालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कॅगचा अहवाल; मोदी सरकारच्या तब्बल १९ खात्यांमध्ये ११७९ कोटींचा घोटाळा
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या तब्बल १९ मंत्रालये आणि त्यांच्याशी संलग्नीत विभागाकडून नियम आणि कायद्यांची मोडतोड करून ११७९ कोटींचा घोळ असल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी मोदी सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. या अहवालाप्रमाणे विभागाकडून अनियमितपणे पैसे खर्च करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या RCEP करारामुळे २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील? राष्ट्रीय किसान महासंघ
थायलंड येथे २१ जुलै रोजी RCEP अर्थात क्रॉप्रेन्सिव इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत ट्रेड करारावर भारताकडून स्वाक्षऱ्या करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने पियुष गोयल हे लवकरच थायलंडला रवाना होणार आहेत. परंतु या करारामुळे देशातील २५ कोटी शेतकरी देशोधडीला लागतील असा आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक के. व्ही. बिजू यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंदिर आणि धर्मावर चर्चा करुन देशात रोजगार निर्मिती होणार नाहीये: सॅम पित्रोदा
मला भारताची खरंच चिंता वाटू लागते जेव्हा मी देशात मंदिर, धर्म, जात, देव अशा विषयांवर वादविवाद आणि संघर्ष पाहतो. देशात रोजगार निर्मिती ही कोणत्याही धर्मामुळे नाही तर केवळ विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकतं असं ठाम मत भारताच्या मोबाइल क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणामुळे अनेक भारतीयांना अमेरिका सोडावी लागेल?
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणानुसार नव्या प्रस्तावावर विचार सुरू केलेला. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे अनेक भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते.
5 वर्षांपूर्वी -
विकासाचे ढोल बडवणाऱ्या देशात २९ कोटी जनतेची कमाई ३० रुपयांहून कमी
फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज त्याच अब्जाधीशांची संख्या ११९ इतकी झाली आहे. जागतिक आकडेवारीतील अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताने अमेरिक आणि चीनसोडून सर्वच देशांना मागे टाकले आहे. परंतु मोठं मोठ्या अब्जाधीशांचे आकडे वाढत असताना, त्यातून देशात वाढत जाणारी श्रीमंत आणि गरिबांमधील दरी दुर्लक्षित होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या राज्यात उदयोग सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र पिछाडीवर: जागतिक बँक
उद्योग संपन्न म्हणून अनेक वर्ष देशभर परिचित असणार महाराष्ट्र राज्य उदयोग सुलभतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र उदयोग सुलभतेच्या बाबतीत देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सुद्धा नाही. अगदी झारखंड आणि छत्तीसगड सारखी मागासलेली समजली जाणारी राज्य सुद्धा महाराष्ट्राच्या पुढे आहेत असं हा जागतिक बँकेचा रिपोर्ट सांगतो.
5 वर्षांपूर्वी -
महिलांना 'मोफत' गॅस जोडणी देणारी 'उज्ज्वला योजना' केवळ दिखावा?
देशातील गरीब महिलांना मोफत गॅस देऊन स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’तील वास्तव समोर आलं आहे. कारण उज्ज्वला अंतर्गत दिले जाणारे गॅस हे मोफत नसून त्यासाठी गरीब महिलांना नवी जोडणी घेताना तब्बल १७५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामधील ९९० रुपये हे शेगडीसाठी आणि ७६० रुपये हे सिलेंडरसाठी आकारले जात असल्याचं वास्तव समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नोएडा'त मोदींच्या हस्ते होणार सॅमसंगच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन
सॅमसंग कंपनीच्या या प्रकल्पाची बोलणी उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सोबत झाली होती. परंतु उत्तर परदेशात सत्तापालट होऊन भाजपचे सरकार स्थापन झाले आणि सर्व काही खोळंबून होत. परंतु त्यानंतर सॅमसंग’च्या प्रतिनिधींनी उत्तर परदेश दौरा करून विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि या प्रकरणाला पुन्हा गती आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून १४ पिकांच्या हमीभावात दीडपट वाढ
आगामी निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ करण्यात आली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि नापिकी सारख्या अनेक प्रश्नांनी होरपळलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना सरकारकडून सामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा झटका?
सर्वसामान्यांना महागाई आधीच डोईजड झाली असताना त्यात आता भाजप-शिवसेनेच्या सरकारकडे महानिर्मिती व महापारेषण या २ वीज कंपन्यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढ व वीजवहनासाठी २,५३२ कोटी रुपये इतकी प्रचंड दरवाढ मागितली आहे. लवकरच आयोगाच्या मंजुरीनंतर याबाबत अधिकृत निर्णय घेऊन अंमलबजावणी होईल. त्यामुळे भाजप शिवसेनेचं युती सरकार लवकरच तुम्हाला वीज दरवाढीचा झटका देणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनंतर आता 'मेट्रोमॅन' ई श्रीधरन यांची सुद्धा बुलेट-ट्रेन बाबत नकारात्मक टीका
देशात मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन’बद्दल मोठा आभास निर्माण केला जात असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच मुंबई अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही मुंबई’ला महाराष्ट्रापासून तोडण्याच्या दूरदृष्टिकोनातून लादली जात असून त्याचा प्रत्यक्ष मुंबई आणि महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नसून, त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा बोजा मात्र महाराष्ट्रावर लादला जाणार आहे. विशेष म्हणजे अहमदाबाद बुलेट-ट्रेन ही केवळ श्रीमंतांसाठी असून त्याचा राज्यातील सामान्यांना काहीच फायदा होणार नसल्याचे त्यांनी अनेकदा अधोरेखित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्विस बँकेतील काळा पैसा बाहेर काढणं दूरच, उलट ५० टक्क्यांनी भारतीयांचा पैसा वाढला
देश विदेशातील काळ्या पैशावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण आणल्याच्या मोदी सरकारच्या दाव्याला स्विस नॅशनल बॅंकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालामुळे मोठा धक्का बसला आहे. कारण त्या अहवालानुसार स्विस बॅंकेत असणारे भारतीयांच्या पैशावर ५० टक्क्यांनी वाढ होऊन ही रक्कम जवळपास ७००० हजार कोटीच्या घरात गेली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
SBI Bank Home EMI Hike | एसबीआयचे गृहकर्ज आजपासून महाग झालं, व्याजदरात वाढ, EMI सुद्धा वाढला
-
TTK Prestige Share Price | लॉटरी शेअर! या शेअरने 55000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडपती केले, शेअरची कामगिरी आणि परतावा पहा
-
Balu Forge Share Price | 93 रुपयाचा शेअर तेजीत, स्टॉक वाढीचे कारण पाहा आणि गुंतवणुकीचा विचार करा
-
Vivanza Biosciences Share Price | या पेनी शेअरने 1500 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल झाले
-
Bharat Agri Fert & Realty Share Price | बहुचर्चित शेअर स्प्लिटने शेअरची किंमत दहापट स्वस्त होणार, खरेदी करणार? आधी 6730% परतावा दिला
-
Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?
-
Voltamp Transformers Share Price | जबरदस्त! 225 टक्के परतावा देणारा हा शेअर तेजीत वाढतोय, ही आहे टार्गेट प्राईस
-
The Elephant Whisperers Documentary | भारताच्या 'द एलिफंट व्हिस्परर्स' शॉर्ट फिल्मला मिळाला ऑस्कर पुरस्कार, पाहा VIDEO
-
Safe Money Investment | हे आहेत सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय, तुमचा पैसा बुडण्याची शक्यता नाही, लक्षात ठेवा
-
Quality Foils India Share Price | नवीन IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास सज्ज, IPO स्टॉकची ग्रे मार्केट कामगिरी पाहा