19 April 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार? Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट, 1 वर्षात 412% परतावा देणारा 39 रुपयाचा शेअर तेजीत येणार?
x

लॉकडाऊनंतर पंतप्रधान कार्यालयातून देशाचा कारभार चालवायचा हट्ट सोडा

RBI Former Governor Raghuram Rajan, Corona Crisis, Covid19

नवी दिल्ली, ६ एप्रिल : भारतासमोर आधीच आर्थिक संकट गोंगावत असताना कोरोना व्हायरसने धडक दिली. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आधीच आर्थिक संकटाच्या दिशेने जाणाऱ्या भारताला मोठा फटका बसला आहे. अशातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी देशाला एका गंभीर धोक्याची जाणीव करून दिली आहे.

“२००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक संकटाची नांदी रघुराम राजन यांनीच सर्वात आधी दिली होती. त्यानंतर जगातील अर्थतज्ञांनी त्यावर आपले मत व्यक्त केले होते. आताही रघुराम राजन यांना सरकारला पुढील आर्थिक आरिष्टाबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केलाय आहे. रघुराम राजन यांनी ‘Perhaps India’s Greatest Challenge in Recent Times’ या शिर्षकाने ब्लॉग लिहिला आहे.

‘भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे,” असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. एकीकडे कोरोनाचं थैमान सुरू असताना आर्थिक आघाडीवरही भारताला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे आता स्पष्ट आहे.

रघुराम राजन यांनी आपल्या ब्लॉगमधून भारतातील सद्य आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी लॉकडाऊनंतर येणाऱ्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. त्यांनी म्हटले की, लॉकडाऊननंतर सरकारने सर्व कारभार पंतप्रधान कार्यालयातूनच चालवायचा हट्ट कायम ठेवला तर फार काही साध्य होणार नाही. कारण आधीच त्यांच्यावर कामाचे ओझे आहे, याकडे राजन यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

तसेच २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर तातडीने कोणत्या गोष्टी करायच्या याची रणनीती सरकारने आखली पाहिजे. मानवतावादी दृष्टीकोनातून देशातील गरजुंना मदत करणे हे अत्यंत आवश्यक आहे. अमेरिका आणि युरोपने आर्थिक पत ढासळण्याची चिंता न करता एकूण जीडीपीच्या १० टक्के रक्कम गरिबांसाठीच्या उपाययोजनांसाठी देऊ केली आहे.

 

News English Summary: The Corona virus was hit by the financial crisis before India. A nationwide lock down was carried out in the wake of the Corona virus. So India is already facing a major blow to the financial crisis. Similarly, former RBI governor and senior economist Raghuram Rajan has warned the country of a serious threat.

 

News English Title: Story india facing greatest emergency since independence RBI Former Governor Raghuram Rajan on Corona virus Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x