23 March 2023 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा SBI Share Price | सरकारी एसबीआय बँकेचा शेअर तेजीत येतोय, शेअरची वाटचाल आणि टार्गेट प्राईस पाहून घ्या Bombay Super Hybrid Seeds Share Price | या शेअरने 6 महिन्यात 278 टक्के परतावा दिला, आता स्टॉक रोज अप्पर सर्किटवर, पैसे लावणार?
x

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर दहशदवादी हल्ला ८ ठार ११ जखमी

Baluchistan, pakistan army, pulwama attack, 11 injured, baluch razi ajoi sangar, digital news, maharashtranama, indian army, marathi news

इस्लामाबाद: जम्मू काश्मीरमधील पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात असताना बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एकूण ९ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हा हल्ला झाला.

द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. तुरबत आणि पंजगुर यांच्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान पोहोचण्याच्या काही तास आधी हा हल्ला झाला.

बलुच राजी अजोई संगरमध्ये तीन संघटनांचा समावेश होतो. बलुच लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुच रिपब्लिकन गार्ड या बलुच राजी अजोई संगरचा भाग आहेत. स्वतंत्र बलुचिस्तान ही या संघटनांची मागणी आहे. आमच्या सहकाऱ्यांनी पाकिस्तानी सैन्याच्या गस्ती पथकावर आणि त्यांच्या तळावर एकाच वेळी हल्ला केला, अशी माहिती बलुच राजी अजोई संगरचे प्रवक्ते बलोच खान यांनी दिली.

दरम्यान, जम्मू काश्मीर पाठोपाठ आता पाकिस्तानात झालेल्या या हल्ल्याने भारतीय उपखंडातील तणाव वाढला आहे. काश्मीरमधील पुलवामात गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. जवानांच्या ताफ्यातील एक बसला कारने धडक दिली. या कारमध्ये २०० किलो स्फोटके होती. या हल्ल्यात सीआरपीएफ’चे तब्बल ४० जवान शहीद झाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x