नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या देशाच्या राज्यघटनेतील कलम ’३५ अ’ कलम रद्द करण्यात यावे, या मागणीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीर खोऱ्यात तणाव असून खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारनंतर रात्रभरात जमात-ए-इस्लामी जम्मू-कश्मीर या संघटनेच्या जवळपास १५० जणांची धरपकड करण्यात आली आहे.
कलम ३५ ए आणि कलम ३७० काश्मीरला विशेष दर्जा देतात. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर या सुनावणीला विशेष महत्त्व आलं आहे. विशेष करून केंद्र सरकार काय भूमिका मांडतं याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत जम्मूमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारी भाजपा कलम ३५ अ विरोधात आहे. हे कलम रद्द करावे अशी भाजापाची भूमिका आहे. काश्मीरमधील दोन प्रादेशिक पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडिपी हे कलम रद्द करण्याच्या विरोधात आहेत.
