नवी दिल्ली, १५ मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या विषयी माहिती देण्याकरता आज तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर देखील उपस्थित आहेत. या पॅकेजअंतर्गत शेती आणि शेतीशी निगडीत इतर उद्योगधंद्याना काय दिलासा मिळणार आहे, यासंदर्भात आज घोषणा केल्या जात आहेत.

कृषि क्षेत्राची क्षमता आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकसीत करण्यासाठी ११ मोठ्या घोषणा आज करण्यात येणार असल्याची सीतारामन म्हणाल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांंसाठी १ लाख कोटी फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मच्छीमारांसाठी २०,००० कोटी रुपयांंचे अनुदान अर्थमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. दोन महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात ७४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं. ५६० लाख लीटर दुधाचं संकलन करण्यात आलं. देशातल्या २ कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचंही स्पष्ट करण्यात आलं.

तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १०००० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मत्स्य उद्योगासाठी २०००० कोटींची मदत देण्यात येणार असून पुढील ५ वर्षांत ७० लाख टन उत्पादन घेण्यात येईल. याद्वारे ५५००० नवीन रोजगार उपलब्ध होतील, असे सीतारामन यांनी सांगितले.

 

News English Summary: According to Finance Minister Nirmala Sitharaman, Rs 1 lakh crore will be provided for the infrastructure required for agriculture. A grant of Rs 20,000 crore has been announced by the Finance Minister for fishermen.

News English Title: Union Finance minister Nirmala Sitharaman 20 lack crore economic package announcement on 3rd day News Latest Updates.

शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज – अर्थमंत्री निर्मला सीतारामन