नवी दिल्ली : लंडनमधील हॅकेथॉनमध्ये सय्यद शुजा नामक हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, ईव्हीएम’वरून देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आगामी निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमांतूनच पार पडतील हे स्पष्ट केले आहे. देशाला पुन्हा मतपत्रिकांच्या युगात घेऊन जाण्याचा आमचा विचार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘आपण यापुढे सुद्धा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करणे सुरुच ठेवणार आहोत. त्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा सज्ज आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी आम्ही मतदानासाठी जुन्या मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरणाऱ्या मागण्यांपुढे आम्ही झुकणार नाही’ असे सुद्धा सुनील अरोरा यांनी स्पष्ट सांगितले आहे.

we are not going again back to the era of ballot papers says election commissioner sunil aroa