3 May 2025 2:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

चिंता मिटली | परीक्षा न देता उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 11वीत प्रवेश मिळेल

SSC Result

पुणे , ०९ जुलै | कोरोना लाटेमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे यंदा अकरावीच्या वर्गात जागा कमी पडतील, ही भीती चुकीची ठरणार आहे. कारण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध विद्यार्थ्यांपेक्षा ३५ टक्के जागा अधिक आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीत हमखास प्रवेश मिळेल. पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मात्र सीईटीचे मार्क महत्त्वाचे ठरतील. यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळेल की नाही, याची चिंता पालकांना सतावते आहे.

शालेय शिक्षण विभागानुसार, राज्याच्या ६ विभागांत २०२०-२१ मध्ये अकरावीच्या ५,५९,३४४ जागा होत्या. ४,४९,०५५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. ३,७८,८६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर १,८०,४८३ म्हणजे ३२ %जागा रिक्त होत्या.

सर्वांना मिळेल प्रवेश : २०२०-२१ च्या दहावीच्या नियमित परीक्षेचा निकाल ९५.३० % लागला होता, तर अनुत्तीर्णांचे प्रमाण ४.७ % होते. पुरवणी परीक्षेत ७५.८६ % विद्यार्थी उत्तीर्ण तर २४.१४ % अनुत्तीर्ण झाले होते. या तुलनेेत अकरावीच्या ३२ % जागा रिक्त होत्या. दरवर्षी विद्यार्थी संख्येत फार बदल होत नाही. मागील वर्षाचा ट्रेंड लक्षात घेता यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तरी प्रत्येकाला अकरावीला हमखास प्रवेश मिळेल, असा विश्वास औरंगाबादचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) डॉ. बी. बी.चव्हाण यांनी व्यक्त केला.

प्रवेशाची अडचण येणार नाही:
शासनाच्या मागेल त्याला शाळा या धोरणामुळे अकरावीचे वर्ग वाढले आहेत. यामुळे अकरावीला जागांचा प्रश्न येत नाही. यंदा सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी जागांची अडचण येणार नाही. प्रत्येकाला प्रवेश मिळेल. – डॉ. बी. बी.चव्हाण, शिक्षणाधिकारी, औरंगाबाद

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: All SSC students will get 11th class admission passed during corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या