27 April 2024 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कोरोना आपत्ती | देशासाठी पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे - केंद्र सरकार

Corona Pandemic

नवी दिल्ली, ७ एप्रिल: महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

या १४ जिल्ह्यांत एकूण ४७,१३९ कोरोनाचे मृत्यू झाले आहेत. राज्यातील एकूण मृत्यूंच्या ८४.१२ टक्के मृत्यू या १४ जिल्ह्यांतील आहेत. कोरोनाचे एक हजाराहून जास्त मृत्यू असलेल्या जिल्ह्यांत कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर हे चार जिल्हे, प. महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा , कोल्हापूर व अहमदनगर हे सहा जिल्हे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व जळगाव हे दोन जिल्हे, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि विदर्भातील नागपूरचा समावेश आहे.

दरम्यान, देशात पुढील चार आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लोकांनी अधिकाधिक जागरूक रहावे, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. निति आयोगाचे (आरोग्य) सदस्य आणि कोरोनाविरोधी कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गहिरे होत चालले आहे. अधिकाधिक लोकांच्या चाचण्या, लसीकरण आणि मास्क वापरणे, बंधनकारक करणे यावर सर्व राज्यांनी भर द्यावा.

 

News English Summary: The next four weeks are crucial in the country. The central government has warned people to be more vigilant to stem the second wave of corona. Member of the Policy Commission (Health) and Chief of the Anti-Corona Action Force, Dr. V. K. Paul said the number of corona sufferers is growing rapidly and the crisis of corona is getting deeper day by day. All states should emphasize the need for more people to be tested, vaccinated and to use masks.

News English Title: The next four weeks are crucial in the country due to corona pandemic said union govt news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x