29 April 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

निवडणुकीपूर्वी ठाण्यातील 'राजकीय ठेकेदार' केवळ मुंबई महापालिकेतील 'ED' राजकारणात व्यस्त, तिकडे ठाण्यातील इस्पितळात मृत्यूचं तांडव

Eknath Shinde

Chhatrapati Shivaji Maharaj Hospital | एकाबाजूला राज्यातील राजकीय परिस्थतीला कारणीभूत ठरलेल्या ठाण्यातील ‘राजकीय ठेकेदार’ सध्या मुंबई महानगपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ‘ED’ मार्गे पक्षविस्तारात व्यस्त झालेले असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतील ‘इस्पितळ ठेकेदारी’ समोर आली आहे आणि याचे बळी ठरत आहेत ठाण्यातील रुग्ण असंच एकूण चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेक घरांमध्ये अश्रुंचे बांध फुटले आहेत.

मात्र याबाबत अद्याप रुग्णालय प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाच जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला होता. आमदार जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा रुग्णालयात धाव घेत प्राशसनाला धारेवर धरले होते. त्यानंतर गेल्या 12 तासांत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पुन्हा एकदा कळवा रुग्णालय चर्चेत आला आहे.

ठाण्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय नुतनीकरणासाठी दोन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे इथे जाणाऱ्या रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे.अशातच अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते.

रुग्णालयाची जवाबदारी ढकलण्यासाठी कारणं

कळवा रुग्णालयातील रुग्णांची संख्या मोठी आहे. पावसामुळे साथीचे आजार वाढले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे. परिणामी प्रशासनावर ताण येत आहे. रुग्णांना वेळेवर अटेंड करणं कठिण होत आहे. त्यातच अनेक रुग्ण गंभीर आजाराचे आहेत. काही रुग्ण शेवटच्या क्षणी रुग्णालयात येतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणं कठिण जातं. प्रत्येक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पण मनुष्यबळाच्या अभावी प्रत्येक रुग्णाला वेळ देता येत नसल्याने उपचारा अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण

या रुग्णालयाची क्षमता 1500 रुग्णांची आहे. पण रुग्णालयात रोज क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण दाखल होत आहेत. काही वेळा तर एका बेडवर दोन रुग्णांना झोपवावं लागत आहे. साथीच्या आजारामुळे ही संख्या अधिकच वाढली आहे. त्यातच डॉक्टर आणि परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याचंही सांगण्यात येतं.

News Title : Thane 17 patients died in Chhatrapati Shivaji Maharaj hospital in Kalwa 13 August 2023.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x