श्रीनगर : जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय जवानांनी मोठी कारवाई करत पाकिस्तानला चांगला दणका देत आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या ५ जवानांना आज ठार करण्यात आलं असून पाक सैन्याचे अनेक बंकर्स सिद्ध भारतीय जवानांनी उद्ध्वस्त केले आहेत. तसेच सर्जिकल स्ट्राईकनंतरची भारतीय लष्कराने केलेली ही पहिली सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हणावे लागेल.

पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काही ना काही घातपात कारण सुरु असतं. सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रीसंधीचे वारंवार उल्लंघन होत होते. पुंछ तसेच राजौरी क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या एकूण ५ रेंजर्संना यमसदनी धाडले आहे. यासोबतच पाकड्यांचे तब्बल १२ बंकर्स सुद्धा भारतीय जवानांनी उद्धवस्त केले आहेत. सदर कारवाईनंतर अधिकारी रणबीर सिंग यांनी प्रसार माध्यमांना अधिकृत माहिती दिली.

after ceasefire violations five pakistani soldiers killed by indian army