लखनऊ, २ ऑक्टोबर : हाथरस प्रकरणामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आपण नुकतंच प्रभू रामचंद्रांच्या मंदिरांचं भूमिपूजन केलं आहे. मात्र हाथरसमध्ये घडलेली घटना त्यानंतर पोलिसांच्या कारवाईबाबत समोर आलेलं प्रश्नचिन्ह या सगळ्यामुळे योगी सरकार आणि भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे असं उमा भारती यांनी म्हटलं आहे. उमा भारती यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत त्यांचं मत मांडलं आहे. योगी आदित्यनाथ हे एक पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रसारमाध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून अडवू नये असंही आवाहन उमा भारती यांनी केलं आहे.

उमा भारती म्हणाल्या की, तुम्ही अगदी स्वच्छ प्रतिमेचे राज्यकर्ते आहात. मीडियातील व्यक्ती आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकांना या पीडित कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी द्या अशी विनंती आहे. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल आहे. मी कोरोनाग्रस्त नसते तर निश्चित मी त्या पीडित कुटुंबाला भेट दिली असती, परंतु रुग्णालयातून डिस्चार्जनंतर मी कुटुंबाची भेट घेईन असं त्यांनी सांगितले.

 

News English Summary: Senior BJP leader Uma Bharti urged Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath to allow politicians and media personnel meet the family members of the Dalit women who was allegedly gangraped in Hathras and later succumbed to her injuries in Delhi’s Safdarjung Hospital.

News English Title: BJP Leader Uma Bharti Reaction Hathras Case Says To Cm Yogi Allow To Meet Victim Family Marathi News LIVE latest updates.

Hathras Gangrape | योगी सरकारसह भाजपाची प्रतिमा मलीन झाली – उमा भारती