नवी दिल्ली, २४ डिसेंबर: दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. सरकारविरोधात उभ्या राहणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे. मग ते शेतकरी असो, मजूर असोत. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

राष्ट्रपतींच्या भेट त्यांनी नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं सांगितलं. कोरोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

 

News English Summary: Congress leaders Rahul Gandhi, Ghulam Nabi Azad and Adhir Ranjan Chowdhury visit Rashtrapati Bhavan. Rahul Gandhi says, “I told the President that these farm laws are anti-farmer. The country has seen that farmers have stood up against these laws

News English Title: Congress leader Rahul Gandhi statement on PM Narendra Modi and RSS Mohan Bhagwat news updates.

मोहन भागवत मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही दहशतवादी ठरवतील – राहुल गांधी