25 April 2024 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Interest Money | पगारदारांनो! तुमचे EPF व्याजाचे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले का? ​EPFO​ ने मोठी अपडेट दिली Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?
x

युपी, बिहार, एमपी आणि छत्तीसगढ मुळे देश मागास: नीति आयोग सीईओं

मुंबई : नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारताच्या विकासासंबंधी बोलताना त्यांनी देशाच्या पुर्वेकडील राज्यांमुळे देश मागास राहिल्याचे विधान केलं आहे.

भारत मानवी विकास निर्देशांकात एकूण १८८ देशांच्या यादीत १३३व्या स्थानावर आहे. परंतु देश मागास असण्याला युपी, बिहार, एमपी आणि छत्तीसगढ ही राज्य जवाबदार आहेत असं त्यांनी मत मांडलं. परंतु अमिताभ कांत यांच्या या विधानाने वाद होण्याची चिन्हं आहेत.

युपी, बिहार, एमपी, छत्तीसगढ आणि राज्यस्थान या राज्यांमुळे आपला देश सामाजिक दृष्ट्या मागास राहिला आहे. उद्योग – व्यावसायात सोपेपणा आणण्यात आपण वेगाने सुधारणा करत आहोत. परंतु मानवी विकास निर्देशांकात मात्र देश खूप मागे असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळेच मानवी विकास निर्देशांकात एकूण १८८ देशांच्या यादीत भारत १३३व्या स्थानावर आहे.

पुढे दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्य उत्तम कामगिरी करत असून त्यांचा विकास वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x