नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.

राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मोदी आणि शहा यांच्यावर ही टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देशातील तरुणांना संबोधित केले आहे. ‘प्रिय तरुणांनो मोदी आणि शहा यांनी तुमचं भविष्य नष्ट केलं आहे. नोकऱ्या मिळत नसल्याने तुमच्या मनात आल्या प्रचंड रोषाला ते समोरं जाऊ शकत नाहीत. त्यांनी देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी केली’, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांच्याबरोबर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका केली होती. “कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्यासह जे उपाय सरकारनं केले आहेत, ते त्यांच्या जवळ असलेल्या उद्योजकांना मदत करणारे आहेत. खरतर ज्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गेले. नोकऱ्या गेल्या. कमी उत्पन्न असणाऱ्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. तळाला असणाऱ्या २५ ते ३५ कामगार वर्गाला मदत करण्याची वेळ आहे. पण, सरकारनं केवळ ८०० कंपन्यांना सरकारनं मदत केली,” असं चिदंबरम यांनी म्हटलं होतं.

 

Web Title:  Former Congress President Rahul Gandhi Slammed PM Narendra Modi and Union Home Minister Amit Shah.

तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं – राहुल गांधी