18 February 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, जीटीएल कंपनी पेनी स्टॉक फोकसमध्ये Horoscope Today | मंगळवार 18 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा मंगळवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध राशी परिवर्तन, 22 फेब्रुवारीपासून या 3 राशींसाठी चांगला काळ सुरु होणार, तुमची राशी आहे का?
x

कारगिल युद्धातील जवानांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होतोय, आता जागे व्हा - माजी लष्करप्रमुख

Former Indian Army Chief General V P Malik

नवी दिल्ली, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील तब्बल 1 लाख 78 हजार 793 लोकांच्या कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे. हा आकडा एखाद्या युद्धातील आकड्यापेक्षाही मोठा आहे. रोज मृत्युमुखी पडणारे लोकं देखील आकड्यात पाहिल्यास आणि असाच रोजच्या मृत्यूचा आकडा कायम राहिल्यास सर्वाचीच झोप उडण्याची शक्यता आहे. मात्र एका बाजूला भयानक स्थिती असताना निवडणुकीच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री निवडणूक प्रचार सभांच्या बाबतीत थांबण्यास तयार नाहीत. किंबहुना त्यांना आजही गांभीर्य नसल्याचं म्हटलं जातंय. पहिला लॉकडाऊन देखील उशिरा आणि कोणतही पूर्व नियोजन न करता मोदींनी जाहीर केला होता. त्यातील उशीर पुन्हा होताना दिसत आहे. त्यालाच अनुसरून भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी केंद्राला सुनावलं आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी कोरोना काळात निवडणूक सभा व शेतकरी आंदोलनात जमणाऱ्या गर्दीवर टीका करत म्हटले की, दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धात जेवढे जवान शहीद झाले होते, त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होत आहे. आता जागे व्हा, असे ते म्हणाले.

 

New English Summary: Former Indian Army Chief General V. P. Malik has told the Center. Former Army Chief General V. P. Malik criticized the crowds at election rallies and the farmers’ movement during the Corona period, saying that more people were being killed in a single day in Corona than in the two-month-long Kargil war. Now wake up, he said.

News English Title: Former Indian Army Chief General V P Malik slams Modi govt over election rally in corona pandemic news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x