20 April 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

कारगिल युद्धातील जवानांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होतोय, आता जागे व्हा - माजी लष्करप्रमुख

Former Indian Army Chief General V P Malik

नवी दिल्ली, १९ एप्रिल: भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून रविवारी रुग्णांचा आकडा दीडकोटीच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 57 हजार 767 संक्रमित झाले आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे 1 कोटी 29 लाख 48 हजार 848 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा 1 लाख 78 हजार 793 झाला आहे. 19 लाख 23 हजार 877 रुग्णांवर संध्या उपचार सुरु आहेत. ऍक्टिव्ह रुग्णांचा हा आकडा अमेरिकेनंतर सर्वात जास्त आहे. मागील चोवीस तासात 1620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशातील तब्बल 1 लाख 78 हजार 793 लोकांच्या कोरोनामुळे आजपर्यंत मृत्यू झाला आहे. हा आकडा एखाद्या युद्धातील आकड्यापेक्षाही मोठा आहे. रोज मृत्युमुखी पडणारे लोकं देखील आकड्यात पाहिल्यास आणि असाच रोजच्या मृत्यूचा आकडा कायम राहिल्यास सर्वाचीच झोप उडण्याची शक्यता आहे. मात्र एका बाजूला भयानक स्थिती असताना निवडणुकीच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री निवडणूक प्रचार सभांच्या बाबतीत थांबण्यास तयार नाहीत. किंबहुना त्यांना आजही गांभीर्य नसल्याचं म्हटलं जातंय. पहिला लॉकडाऊन देखील उशिरा आणि कोणतही पूर्व नियोजन न करता मोदींनी जाहीर केला होता. त्यातील उशीर पुन्हा होताना दिसत आहे. त्यालाच अनुसरून भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी केंद्राला सुनावलं आहे.

माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी कोरोना काळात निवडणूक सभा व शेतकरी आंदोलनात जमणाऱ्या गर्दीवर टीका करत म्हटले की, दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धात जेवढे जवान शहीद झाले होते, त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होत आहे. आता जागे व्हा, असे ते म्हणाले.

 

New English Summary: Former Indian Army Chief General V. P. Malik has told the Center. Former Army Chief General V. P. Malik criticized the crowds at election rallies and the farmers’ movement during the Corona period, saying that more people were being killed in a single day in Corona than in the two-month-long Kargil war. Now wake up, he said.

News English Title: Former Indian Army Chief General V P Malik slams Modi govt over election rally in corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x