केरळ : केरळमध्ये कालपासून पावसाने थैमान घातले असून त्यात जवळपास २९ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तुफान बरसणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे इडुक्की धरण पूर्ण भरले असून आता पाणी ओसंडून वाहू लागल्याने धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

केरळच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवली असल्याचं म्हटलं जात आहे. या अतिवृष्टीमुळे जवळपास ५४००० लोकं बेघर झाल्याचं केरळ सरकारने म्हटलं आहे. तुफान पावसाचा फटका जवळपास ६ जिल्ह्यांना बसल्याच वृत्त आहे. सरकाकडून सर्व मदत कार्य सुरु असून अनेक ठिकाणी पावसामुळे मदतकार्यात सुद्धा अडथळे येत आहेत.

अनेक ठिकाणी सुरक्षेच्या करणामुळे शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असून लोकांनी महत्वाच्या कामा शिवाय घराबाहेर पडू नये असं सरकाकडून कळविण्यात येत आहे. मदत कार्यात तब्बल १०,४०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Heavy rain at Kerala state in 50 years history