नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू समाज नाही आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करणं, म्हणजे हिंदूंना विरोध करणं नाही, असं वक्तव्य संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. राजकीय लढाई सुरुच राहणार आहे, त्याला हिंदूंशी जोडू नका, असंही भैय्याजी जोशी बोलताना म्हणाले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
Suresh Bhaiyyaji Joshi, Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) general secretary in Goa: Hindu community does not mean Bharatiya Janata Party, and opposing BJP does not amount to opposing Hindus. Political fight will continue but it should not be linked to Hindus. pic.twitter.com/XBal0PM9zF
— ANI (@ANI) February 9, 2020
सीएए, एनआरसीवरून देशात दोन गट पडल्याचं चित्र आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून भारतीय जनता पक्षाला विरोध केला जात आहे. अशातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं यावर भूमिका मांडली असून, “हिंदू समाज म्हणजे भारतीय जनता पक्ष नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नाही,” असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस भैय्याजी जोशी यांनी मांडले आहे. भय्याजी जोशी म्हणाले, भारतात काम करू इच्छिणाऱ्यांनी हिंदूसोबत त्यांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. भारताला हिंदू समाजापासून वेगळ करून पाहता येणार नाही. हिंदू सदैव या देशाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज केवळ हिंदूमुळेच जिवंत आहे.
Sarkaryawah Suresh Bhaiyyaji Joshi ji (@RSSorg ) addressed on ‘Vishwaguru Bharat: The Perspective of RSS’ at Goa. pic.twitter.com/GWDIRsQYxb
— VSK ASSAM (@VSKASSAM) February 10, 2020
हिंदू हा हिंदू समाजाचा शत्रू होत आहे, म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा शत्रू होत आहे. हिंदू समुदायाचा अर्थ भारतीय जनता पक्ष नाही. विशेष म्हणजे भैय्याजी जोशींचं हे विधान नागरिकत्व सुधारणा कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)ला विरोध होत असताना आल्यानं त्याल महत्त्व प्राप्त झालं आहे. एक हिंदू आपल्या हिंदू भावाविरोधात लढतो कारण तो त्यावेळी धर्म विसरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनाही आपल्या कुटुंबीयांचा विरोध सहन करावा लागला होता. जिथे गोंधळ आणि आत्मकेंद्रीपणाचा व्यवहार असतो, तिकडे विरोध हा होतच असतो. लोकांच्या अज्ञानाचा आणि दारिद्र्याचा फायदा उठवून ख्रिस्ती धर्मात रूपांतर करण्याचा आरोपही भैय्याजी जोशींनी केला आहे. जर कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारणार असेल तर आम्हाला आक्षेप नाही. परंतु जबरदस्तीनं धर्मांतर करणं हा गुन्हा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
Web Title: Hindu community does not mean BJP says RSS Leader Bhaiyyaji Joshi.
