1 May 2025 7:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

बलात्काराच्या घटनेनंतर मोदींच्या गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलन पेटलं

अहमदाबाद : गुजरात राज्यातून सध्या उत्तर प्रदेशातील आणि बिहारच्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. कारण चिमुकल्या मुलीवर क्रूर पणे बलात्कार झाल्यानंतर गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. या हिंसक हल्ल्यात यूपी आणि बिहारी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे.

त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे. त्यामुळे चिघळत चाललेल्या परिस्थितीमुळे गुजरात पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमधून गुजरात पोलिसांनी तब्बल १८० जणांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर विषय पेट घेण्याआधी पोलिसांनी या प्रकरणात रविंद्र साहू या आरोपीला अटक केली आहे. रविंद्र साहू हा मूळचा बिहारचा आहे हे समोर येताच, त्याच्या अटकेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीय आणि बिहारच्या कामगारांवर हिंसक हल्ले होण्यास सुरुवात झाले.

गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी परिस्थितीवर बोलताना म्हटलं आहे की, बाहेरच्या राज्यातून आलेल्या नागरिकांना गुजरातमध्ये अनेक ठिकाणी लक्ष्य केले जात आहे. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही. आतापर्यंत पोलिसांनी एकूण १५० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे तसेच परप्रांतीय ज्या भागात मोठ्या संख्येने रहातात तिथे पोलिसांच्या गस्त वाढवल्या आहेत.

चिमुकल्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर विशिष्ट समाजाचे लोक परप्रांतीयांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करत आहेत असे डीजीपी शिवानंद झा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हल्ल्या प्रकरणी ठाकोर समाजाच्या लोकांनावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने अल्पेश ठाकोर यांनी ७२ तासांच्या आत आमच्या समाजाच्या लोकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी उचलून धरली आहे. तसेच त्यांनी शांततेचं आवाहन सुद्धा केलं आहे. आमची आणि ठाकोर सेनेची बदनामी करण्याचा हा कट आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या