नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन आणि देशांतर्गत वाढती असहिष्णूता आणि देशातील जास्तीत जास्त पैसा केवळ श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने भारतात गरीब-श्रीमंतांमध्ये निर्माण झालेल्या दरी मुळे त्यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी जाहीरपणे त्यांचं मनोगत उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, “देश सध्या एका अत्यंत अवघड परिस्थितीमधून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम तसेच सहिष्णूतेचे धडे विश्वाला दिले आहेत. तीच भूमी आज असहिष्णुतेत, एकूणच मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे जगभर चर्चेत आली आहे. सध्या देशातील सरकारी संस्थांवरचा सामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे. तसेच या संस्थांच्या कामकाजाबाबत आणि कार्यपद्धतीमुळे एक संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेव्हा एखादा देश बंधुभाव तसेच सहिष्णुतेचे स्वागत करते तेव्हा तो देशांतर्गत विविध समाजाच्या सद्भावनेला प्रोत्साहित करतो. जेव्हा आपण एकमेकांबद्दलच्या द्वेषाला दूर करतो आणि आपल्या रोजच्या जीवनातील ईर्ष्या तसेच आक्रमकता दूर करतो तेव्हा तिथे आपणहून शांती आणि बंधुभाव निर्माण होतो. सर्वात उत्तम वातावरण अशा देशांत असते जो देश आपल्या सामान्य नागरिकांना त्यांना हव्या असलेल्या मुलभूत सोयी-सुविधा पुरवतो. तसेच त्यांना सुरक्षा आणि स्वायत्तता प्रदान करतो असं प्रणव मुखर्जी म्हणाले.

India is passing through a very difficult phase says former president of india pranab mukharji