नवी दिल्ली : भारतीय वायू दलाचे आसामहून अरुणाचल प्रदेशाच्या दिशेने जाणारे एएन – ३२ हे विमान १३ प्रवाशांसह बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. विमानात ८ क्रू मेम्बर्स आणि ५ प्रवाशांचा समावेश होता. आसामहून अरुणाचल प्रदेशाकडे जाण्यासाठी दुपारी या विमानाने उड्डाण केले. दुपारी १ वाजता या विमानाचा संपर्क तुटला.
Indian Air Force launches Sukhoi-30 combat aircraft and C-130 Special Ops aircraft on a search mission for locating the IAF AN-32 Aircraft that last contacted ground sources at 1 PM https://t.co/AciubbR92w
— ANI (@ANI) June 3, 2019
बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई वायू दलाचे सुखोई हे लढाऊ विमान आणि सी – १३० हे विशेष विमान तैनात केले आहे. हवाई दलाचे एएन – ३२ विमान बेपत्ता होण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी २०१६ साली २९ जणांसह एएन – ३२ बंगालच्या उपसागरात कोसळले होते.
याआधी देखील २०१६ मध्ये चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरला जाणारे AN-३२ विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाचे १२ जवान, ६ कर्मचारी, १ नौदलाचा जवान, १ सैन्यदलाचा जवान आणि एका कुटुंबातील ८ सदस्य होते. १ पाणबुडी, ८ विमाने आणि १३ युद्धनौकांच्या मदतीने या विमानाचा शोध घेण्यात आला होता. यानंतरही या विमानाबद्दल माहिती मिळाली नव्हती.
