जम्मू : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात परतले. मात्र, सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.

जम्मू-काश्मीरमधील मेंढर, उरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी रेंजर्सने गोळीबार केला. या गोळीबारात पुंछ जिल्ह्यातील एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले. त्यांच्याकडून ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारने हल्ला केला जात आहे. पुंछ जिल्ह्यातील सलोत्रीमध्ये मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात एकाच परिवारातील तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.

Pakistan army violates ceasefire again three people died firing