बंगळुरू: आपल्या देशात लोकं कुठे शहाणपणा दाखविण्या ऐवजी बेजवाबदारीने वागतात हेच वेळोवेळी समोर आलं आहे. तसाच प्रकार कर्नाटकात घडला आहे तो देखील प्रत्यक्ष रेल्वेच्या बाबतीत हे भीषण म्हणावं लागेल. बंगळुरू ट्रेन इंजिनच्या डिझेलची टाकी लिकेज असल्यामुळे संबंधित रेल्वे याल्वीगी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती.
मात्र आपत्कालीन परिस्थितीत थांबविण्यात आलेल्या रेल्वेच्या इंजिनची डिझेलची टाकी लिकेज असल्याची बातमी आसपासच्या परिसरात पसरताच स्थानिक अक्षरशः नळाला पाणी भरायला लाईन लावतात तसे घरातील खाली भांडी घेऊन पोहोचले. एखाद्या रेल्वेचं भरलेलं इंधन खाली केल्यास त्यामुळे प्रवासात काय परिस्थिती उद्भवू शकते याचं देखील लोकांना भान नसल्याचं दिसून आलं.
भारतीय लोकांची हीच वृत्ती अनेकदा मोठमोठ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरली आहे. मात्र अशा घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत, उलट त्यात अधिक वाढ होताना दिसत आहे. तसाच काहीसा प्रकार पुन्हा कर्नाटकात घडला असून, लोकांच्या अशा बेजवाबदारपणापुढे प्रशासन देखील अनेकदा हतबल होतं असल्याचं पाहायला मिळालं आहे.
