नवी दिल्ली : कलम ३५- ए आणि ३७० वरून गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण तापत चाललं आहे. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत आहेत. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही मान्यता दिली. त्यानंतर देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला.
जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या कायद्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल तर लडाख हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल असा प्रस्ताव अमित शाह यांनी राज्य सभेत मांडला होता. यामुळे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्यात आले. या तरतुदीमुळे जम्मू व काश्मीरचा दर्जा अन्य राज्यांप्रमाणेच होणार आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन अधिकृतपणे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मोदी काय बोलणार याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा ८ चा योग जुळून आला आहे.
Prime Minister Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM today.
— PMO India (@PMOIndia) August 8, 2019
