26 April 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

काश्मीरमध्ये तिरंगा फडणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Modi government, Jammu Kashmir, land purchase

मुंबई, १ नोव्हेंबर: ‘काश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले होते,’ असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

काश्मीरमधील कलम ३७०चा प्रश्न निकाली लागला त्यानंतर आता इथं बिगर काश्मिरींना सरकारी आदेशानं जमिनी खरेदी करण्यास मुभाही मिळाली आहे. मात्र, अद्यापही श्रीनगरच्या चौकात भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यास बंदी आहे. त्यामुळे इथं जर तिरंगा फडणार नसेल तर जमिनीचे तुकडे घेऊन करायचं काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील आपल्या रोखठोक या सदरातून केला आहे.

कश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून ‘ब्लॅकमेल’ करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र 370 कलम हटवल्यावर कश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही कश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.

 

News English Summary: Following the resolution of Article 370 in Kashmir, non-Kashmiris are now allowed to purchase land by government order. However, hoisting of the Indian national flag is still banned in Srinagar. So if the tricolor is not going to fly here, what to do with the pieces of land? MP Sanjay Raut has asked this question in his headline ‘Saamana’

News English Title: Shivsena MP Sanjay Raut slams Modi government over Jammu Kashmir land purchase issue news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x