5 May 2025 2:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

भीषण बेरोजगारी? रेल्वे पोलिसांच्या केवळ १११७ जागांसाठी तब्बल १४ लाख ७१ हजार अर्ज

Narendra Modi

मुंबई : भारतीय रेल्वे विभागाकडून रेल्वे पोलीस दल आणि रेल्वे पोलीस सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक संवर्गासाठी (आरपीसीएफ) १११७ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या जागांच्या भरतीसाठी देशभरातून तब्बल १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. म्हणजेच एका जागेसाठी जवळपास १३१७ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे आहे. यात अर्ज करणारे सर्वाधिक उमेदवार हे महाराष्ट्रातून असल्याचे समजते.

देशात आजही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुण आणि तरुणींमध्ये चाललेली स्पर्धा आणि देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली बेरोजगारी यांच्याकडे पाहिल्यास कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. दरम्यान स्पर्धा परीक्षांकडे तरुणाईचा कल वाढला असून गावकडील मुले देखील आज स्पर्धा परीक्षांवर जोर देत आहेत. त्यातून या स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि स्पर्धा वाढली आहे. त्यातच, पोलीस भरती, सैन्य भरती आणि रेल्वे भरती यासाठीही ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. नोकरीच्या अधिकृत जाहिरातीसाठी तरुण दैनिक वर्तमानपत्र आणि संबंधित वेबसाईटवर अपडेट असतात.

नुकतेच रेल्वे विभागाकडून RPF आणि RPSF संवर्गातील उपनिरीक्षक पदांच्या १११७ जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या भरतीला एकूण १४ लाख ७१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये पुरुष प्रवर्गासाठी एकूण ८१६ जागांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. या ८१६ जागांसाठी १२.४० लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तर, महिला प्रवर्गातील ३०१ रिक्त पदांसाठी एकूण २.३१ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती पाहता देशातील बेरोजगारी किती भीषण झाली आहे याचा अंदाज येतो. त्यामुळे केवळ सरकारी नोकरी नाही तर खाजगी क्षेत्रात देखील अधिक रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी मोठी मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या