25 April 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

आम्ही त्यांना एनडीएतून बाहेर काढले नाही | शिवसेना - अकाली दलच एनडीएमधून बाहेर पडले

Union Home Minister Amit Shah, Shivsena, Akali Dal, NDA

नवी दिल्ली, १८ ऑक्टोबर : “राज्यपालांना आपल्या पत्रात काही वेगळे शब्द वापरता आले असते. काही शब्द टाळता आले असते”, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, मंदिर खुली करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. या पत्रात राज्यपालांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वावर बोट ठेवले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्रातून सडेतोड प्रत्युत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल-मुख्यमंत्र्यांमधील हाच पत्रव्यवहार राजकीय वर्तुळात गाजतो आहे.

नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी महाराष्ट्रातील परिस्थिती आणि राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रव्यवहार यावर भाष्य केले आहे. “तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिरस्कार होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?”, असा बोचरा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर, “राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, दुसरे शब्द वापरता आले असते”, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

दरम्यान शिवसेना, अकाली दलानं भाजपची साथ सोडली. शिवसेना गेल्या वर्षी भाजपची साथ सोडली. तर अकाली दलानं कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून एनडीएला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना आणि अकाली दल भाजपचे जुने मित्र पक्ष होते. त्यांनी भाजपशी फारकत घेतल्यानं भाजपप्रणित एनडीएला धक्का बसला. त्यावर अमित शहांनी ‘नेटवर्क१८’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. ‘एनडीएमध्ये आजही ३० पेक्षा जास्त पक्ष आहेत. शिवसेना आणि अकाली दलानं भाजपची साथ सोडली. आम्ही त्यांची साथ सोडली नाही,’ असं शहा म्हणाले.

शिवसेना, अकाली दलासोबत पुन्हा हातमिळवणी करणार का, त्यांच्यासाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत का, असे प्रश्न शहांना विचारण्यात आले. त्यावर ‘मी काही ज्योतिषी नाही. पण सध्या तरी ते (अकाली दल) कृषी विधेयकांवर अडून राहिले आहेत. शिवसेना आणि अकाली दलाला आम्ही एनडीएतून बाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. ते स्वत:च एनडीएमधून बाहेर पडले. त्याला आम्ही काय करू शकतो?,’ असं शहा यांनी म्हटलं.

 

News English Summary: Shiv Sena, Akali Dal left BJP. Shiv Sena left BJP last year. The Akali Dal left the NDA on the issue of the Agriculture Bill. Shiv Sena and Akali Dal were old allies of BJP. His split with the BJP came as a shock to the BJP-led NDA. Amit Shah reacted to this in an interview given to ‘Network 18’. The NDM still has more than 30 parties. Shiv Sena and Akali Dal left BJP. We did not leave them alone, ‘said Amit Shah.

News English Title: Union Home Minister Amit Shah made his stand clear about alliance with Shivsena News updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x