26 April 2024 1:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कोणतेही युद्ध सुरू नसताना सीमेवर जवान शहीद का होत आहेत? : मोहन भागवत

नागपूर : सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आरएसएस’चे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी अयोध्येतील राम मंदिर मुद्द्यावरून मोदी सरकारवर बोचरी टीका केली. तर दुसरीकडे आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शहीद होण्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कोणतेही युद्ध सुरू नसताना देखील सध्या भारतीय सैन्याचे जवान शहीद का होत आहेत?’ असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.

परंतु हा प्रश्नावर ते पुढे म्हणाले ‘कारण आम्ही आपले काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून असे घडते’ असं भागवतांनी म्हटलं आहे. काल नागपूरमध्ये प्रहार समाज जागृती संस्था रजत जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं.

देशाच्या सीमेवर जवान शहीद होण्याच्या घटना वाढत जात असल्याचे सांगताना, त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या काळाचा सुद्धा थेट उल्लेख केला. ज्यावेळी देशाला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळत नव्हते तेव्हा स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले जात असत. परंतु, स्वातंत्र्यानंतर जर कोणत युद्ध झालं किंवा होत असेल तर सीमेवर भारतीय लष्कराचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यानंतर त्यांनी कोणतेही युद्ध सुरू नसताना सुद्धा जवान शहीद होण्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केला.

हॅशटॅग्स

#RSS(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x