नवी दिल्ली: देशातील १३० कोटी लोकांना संघ हिंदूच मानतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सरसंघचालकांनी हिंदुत्वावरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीयमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Union Min Ramdas Athawale on Mohan Bhagwat’s remark ‘130 cr population of India as Hindu society’: Not right to say all are Hindus.There was a time when everyone was Buddhist in our country. When Hinduism came, we became a Hindu nation. If he means everyone is ours then it’s good pic.twitter.com/bXWIsHhDbU
— ANI (@ANI) December 26, 2019
सरसंघचालकांनी गुरुवारी म्हटले होते की, देशातील १३० कोटी लोकांना धर्म आणि संस्कृतीच्या पुढे जाऊन आम्ही हिंदूच मानतो. यावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांनी असहमती दर्शविली. सर्व भारतीय हिंदू आहे, हे म्हणणे उचित नाही. एका काळी आपल्या देशात सर्व बौद्ध होते. जर भागवतांना देशातील सर्व लोक भारतीय म्हणयाचं असेल तर ठिकच आहे. देशात बौद्ध, शिख, हिंदू, मुस्लीम, पारसी, जैन आणि लिंगायत पंथाचे लोक राहतात, असंही ते पुढं म्हणाले.
हैदराबाद येथे बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय विजय संकल्प शिबीरात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील १३० कोटी जनतेबाबत विधान केले होते. देशात राहणारी १३० कोटी जनता कोणत्याही धर्माची आणि संस्कृतीची असली तरी आरएसएस या सर्वांना हिंदूच मानत आला आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते.
Web Title: Union Minister Ramdas Athawale not happy with the Mohan Bhagwat Statement over Hindu.
