1 May 2025 12:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून मोदी सरकार कोणता घाट घालतंय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं

Citizenship Amendment Bill 2019, CAB Bill 2019 Approval, Vanchit Leader Prakash Ambedkar

नवी दिल्लीः बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत.

मात्र आता मोदी सरकारची खरी कसोटी राज्यसभेत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकात बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील हिंदू, जैन, इसाई, शीख, बौद्ध आणि पारसी समाजाच्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकातून मुस्लिम समाजाला बाहेर ठेवण्यात आलं आहे. त्यावरुनच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार आहे. काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, यावर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली असून केंद्र सरकारच्या हेतूवरच त्यांनी शंका घेतली आहे. देशातील नवरत्ने (सरकारी कंपन्या) विकण्याचा घाट घातला जातोय, जीएसटी ६ टक्क्यांनी वाढवण्याचा घाट आहे. महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नाहीय. अशा वेळी लोकांना फसवण्यासाठी, भयानक अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती लोकांसमोर येऊ नये म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक आणून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

सर्वसामान्य नागरिकांना विनंती करतो की त्यांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये. यातून काहीही साध्य होणार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी आसाम मध्ये गोंधळ घातलाय तोच गोंधळ घालायचाय. यांना नव रत्ने विकायचीय त्यामुळे हे बिल आणलंय असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

Vanchit Leader Prakash Ambedkar slams Modi Government over Citizenship Amendment Bill 2019 Approval in Parliament

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या