
Property Rights | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी ही गोष्ट नक्कीच अनुभवली असेल ती म्हणजे, मुलीच्या लग्नानंतर तिला वडीलोपार्जित संपत्तीवर हक्क मिळतो की नाही. आतापर्यंत या प्रश्नांवर बऱ्याच व्यक्तींनी वक्तव्य केली आहेत. दरम्यान अनेकांना ही घडी अजूनही सुटलेली नाही की, खरंच मुलींना लग्नाआधी किंवा लग्न झाल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क मिळतो का. आज आपण या सर्व गोष्टींवर सविस्तर माहिती घेणार आहोत.
मुलींना वडील पाहिजेत संपत्तीवर हक्क मिळतो की नाही या संदर्भात भारत सरकारने 1965 साली हिंदू उत्तरअधिकारी कायदा स्थापन केला होता. या कायद्यामध्ये संपत्तीचे वाटप त्याचबरोबर वारसासंबंधितच्या बऱ्याच गोष्टी सुनिश्चित केल्या आहेत. 2005 साली या कायद्यामध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. याचा आढावा आपण संपत्तीत मुलीला वाटा असतो की नाही हे पाहणार आहोत.
लग्नानंतर वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो का :
प्रत्येक मुलीच्या मनात हा प्रश्न नक्कीच असतो तो म्हणजे आपल्याला आपल्या वडिलांच्या संपत्तीवर हक्क मिळवता येतो का. तर, 2005 साली बदललेल्या कायद्यानुसार मुली देखील त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीवर हिस्सेदारी घेऊ शकतात. त्या त्यांच्या जन्मापासून वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार गाजवतात. 1956 कायद्याअंतर्गत देखील मुलाप्रमाणे मुलगी देखील संपत्तीमध्ये समान अधिकारी मानली जाते.
वडिलांच्या संपत्तीवर मुलगी कधी हक्क गाजवत नाही :
समजा तुमच्या वडिलांनी हयातीमध्ये इच्छापत्र बनवलं असेल आणि इच्छापत्रात संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावे होणार असं लिहिलं असेल तर, मुलींना वडिलांच्या संपत्तीवर काडीचाही अधिकार नसतो. केवळ इच्छापत्र बनवले नसेल तरच मुलगी आपल्या वडिलांच्या संपत्तीवर दावा ठोकू शकते.
संपत्ती संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवा :
तुमच्या वडिलांच्या मालमत्तेवर फौजदारी दाखल असल्यास मुलगी किंवा घरातील कोणताही सदस्य वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगू शकत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुलीने आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून गरजे वेळी कायद्याचा आधार घेतला पाहिजे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.