रायगड, १३ जुलै : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी करोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेत, हा निर्णय घोषित केला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र, किराणा माल आणि भाजी विक्री बंद राहणार आहे. त्यामुळं जिल्ह्यात कोरोनाचा हा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागातील नागरिकांनी स्वयंशिस्तिनं लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून अनेक परिसरांमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला. किंबहुना शासनाकडून या भागांमध्ये कडक लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात यावी अशी मागणीही कैक स्थानिकांनी केली होती.
News English Summary: In view of the increasing prevalence of Corona virus, it has been decided to impose a lockdown once again in Raigad district to curb the spread of the virus.
News English Title: Decision of ten days lockdown in Raigad district News Latest Updates.
