मुंबई: लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर केवळ वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जागा पडल्या यावरच चर्चा रंगली होती. दरम्यान, विधानसभेच्यावेळी काँग्रेस-राष्ट्र्वादीने अनेक प्रस्ताव समोर ठेऊन देखील प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सामील न होता, केवळ अवास्तव मागण्या करून चर्चेत राहिले. वंचित बहुजन आघाडी इतिहास रचनार असं काहीसं चित्र उभं करण्यात आलं.

परिणामी, काँग्रेस आघाडीला मदत करणारे आनंदराज आंबेडकर देखील वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. इतकंच काय तर अकोल्यात देखील तेच चित्र पाहायला मिळालं. परिणामी, वंचित आघाडी केवळ भाजपाला प्रत्यक्ष मदत करत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. निवडणुकीपूर्वीच इतर वरिष्ठ नेते देखील वंचितला सोडून तरी आता आनंदराज आंबेडकर यांनी देखील वंचितला सोडचिट्टी दिली आहे.

दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीमुळे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय हवाच निघून गेली आहे. त्यात जोगेंद्र कवाडे काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत असताना आणि त्यात रामदास आठवले देखील सध्या भाजपमध्ये असून देखील शरद पवारांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचित राजकारणातून वंचितच राहणार असंच चित्र आहे.

विशेष म्हणजे रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन कार्यक्रमात याबाबतची ते घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दादर येथील आंबेडकर भवनात रिपब्लिकन सेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून वंचितमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन सेनेत येण्यासाठी ते अवाहन करणार आहेत. आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी वंचितला सोडचिठ्ठी देण्याबाबतचा निर्णय घेणे हे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभेतल्या मोठया अपयशानंतर वंचित’मध्ये फूट; आनंदराज आंबेडकरांची सोडचिठ्ठी?