आनंदराज आंबेडकरांनंतर अण्णाराव पाटील यांनी देखील वंचित आघाडी सोडली?
![Prakash Ambedkar, Annarao Patil, Anandraj Ambedkar, VBA, Vanchit Bahujan Aghadi](https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/does-there-any-rift-between-annarao-patil-and-prakash-ambedkar.jpg?v=0.941)
लातूर: आनंदराज यांच्यानंतर लातूरचे अण्णाराव पाटील हेही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर नसल्याचे समोर आले आहे. अण्णाराव पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र लोकसभा- विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचित आघाडीचा प्रवाह बळकट करण्याचा निर्णय घेतला. अण्णाराव पाटील यांनी भटके विमुक्त, ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपली ताकद वापरली. अण्णाराव यांच्याकडे ‘वंचित’च्या पार्लमेंटरी बोर्डाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते कोल्हापूर अशी सत्तासंपादन यात्रा काढण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भुमिका घेवून पाटील राज्यभर फिरले होते. मात्र निवडणूक झाल्यापासून ते आंबेडकरांपासून अंतर ठेवून आहेत.
काही दिवसांपुर्वी प्रकाश आंबेडकर यांनी ‘भारीप’चे विलीनीकरण वंचित आघाडीत केले. त्यावेळीही अण्णाराव पाटील उपस्थित नव्हते. दुसऱ्या बाजूला अण्णाराव यांनी आपल्या मूळ पक्षाचे काम सुरू करून औरंगाबादमध्ये मेळावा घेतला. दोन दिवसांपुर्वी त्यांनी यवतमाळ- वाशिमच्या विधान परिषद निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देवून निवडणुकीत रंगत आणली आहे. महत्वाची बाब म्हणजे अण्णाराव हे हेलिकॉप्टर घेवून प्रचाराला गेले असल्याने नव्याने चर्चेत आले आहेत.
तत्पूर्वी वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली होती. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं होतं.
पुढे बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले होते, “वंचित बहुजन आघाडीला आम्ही पाठिंबा दिला होता, पण वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे. वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आंबेडकरी समाज वंचित आघाडीबाबत निराश झाला आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आलेले ओबीसी नेते हे खरे ओबीसी समाजाचे नेते होते का? हा प्रश्न आहे. त्यामुळे वंचित आघाडी समाजापर्यंत पोचली का हा देखील गंभीर प्रश्न आहे. वंचित सोबत जोडल्या गेलेल्या इतर घटकांचे मतदान वंचितला मिळाले का हा देखील मोठा प्रश्न आहे.”
लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर केवळ वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जागा पडल्या यावरच चर्चा रंगली होती. त्यानंतर, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्र्वादीने अनेक प्रस्ताव समोर ठेऊन देखील प्रकाश आंबेडकर आघाडीत सामील न होता, केवळ अवास्तव मागण्या करून ते चर्चेत राहिले. वंचित बहुजन आघाडी इतिहास रचनार असं काहीसं चित्र उभं करण्यात आलं.
परिणामी, काँग्रेस आघाडीला मदत करणारे आनंदराज आंबेडकर देखील वंचित बहुजन आघाडीत सामील झाले. मात्र प्रत्यक्ष निकालानंतर वंचितला एकही जागा जिंकता आली नाही. इतकंच काय तर अकोल्यात देखील तेच चित्र पाहायला मिळालं. परिणामी, वंचित आघाडी केवळ भाजपाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे आरोप होऊ लागले होते. निवडणुकीपूर्वीच वंचित’मधील इतर वरिष्ठ नेते देखील वंचितला सोडून गेले होते. मात्र त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी देखील वंचितला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीमुळे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय हवाच निघून गेली आहे. त्यात जोगेंद्र कवाडे काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत असताना आणि रामदास आठवले सध्या भाजपमध्ये असून देखील शरद पवारांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचित राजकारणातून वंचितच राहणार असंच चित्र सध्या आहे, किंबहुना राहिलंच तर ते अकोला पुरतीच मर्यादित राहील असं चित्र आहे.
Web Title: Annarao Patil may left Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, कमाईची संधी, आली फायद्याची अपडेट
-
HAL Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, शॉर्ट टर्ममध्ये दिला 221% परतावा
-
Credit Card Application | होय! इन्कम-प्रूफ नसेल तरी मिळेल क्रेडिट कार्ड, हे आहेत सोपे आणि सुरक्षित पर्याय
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या
-
Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपच्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 5 वर्षांत दिला 4000% परतावा
-
Home Loan Alert | नोकरदारांनो! वयाच्या 40 व्या वर्षी गृहकर्ज घेताय? या 5 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा...
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता वाढ होणार, आकडेवारीबद्दल अपडेट आली
-
ITR Filing | पगारदारांनो! ITR डेडलाईन चुकल्यास केवळ दंडच नव्हे, तर 'हे' 5 नुकसान देखील होणार
-
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'व्या वेतन आयोगाची घोषणा होणार, वेतन-पेन्शन-भत्त्यांमध्ये वाढ
-
Tanla Share Price | मल्टिबॅगर तानला शेअरबाबत फायद्याची अपडेट, खरेदीला गर्दी, 2 दिवसात 15% परतावा दिला