मुंबई, १२ जुलै | ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या शहरातून गाय चोरीच्या घटना समोर आली होती. बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच या गाय चोरीच्या घटना घडताना समोर आल्याने राजकारणही करण्यात आलं. त्यामुळे विरोधकांनी भिवंडीतील कत्तलखाने पुन्हा सक्रिय झाल्येत का? असा सवाल उपस्थित केला होता.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आनगाव जवळील कवाड या ठिकाणी गायींची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. कवाडचे रहिवासी असणाऱ्या मंदार लेले यांच्या राहत्या घरातून त्यांच्या दोन गाई चोरीला गेल्या होत्या. या दोन्ही गायी गिर जमातीचा होत्या. तर चोरीला गेलेल्या या दोन्ही गायी गाभण होत्या. ९ जुलैच्या रात्री ही चोरीची घटना घडली होती.

त्यानंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करताना चूक केली आणि आता राजकीय कोंडी झाल्याने माफी मागण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी कसाई ऐवजी खाटीक असा शब्दप्रयोग केल्यानंतर त्यांच्यावर समाज माध्यमांतून टीका सुरु झाली होती. मात्र त्यांनी सारवासारव करताना माफी मागितली आहे आणि आपण या समाजासाठी किती लढा दिला आहे याची देखील हास्यास्पद आठवण करून दिली आहे.

अतुल भातखळकर यांनी आता ट्विट करताना म्हटलंय की, “भिवंडीत गाभण गायी चोरणारे कसाई ठाकरे सरकारच्या कृपेने अजूनही मोकाट आहेत.या आधीच्या ट्विटमध्ये कसाई ऐवजी खाटीक असा अनावधानाने उल्लेख झाला.हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या कॅ.नीलेश पेंढारी, सुधीर निकम,शेखर लाड या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मी यासंदर्भात दिलगीर व्यक्त केली. हिंदू खाटीक समाजाच्या समस्या यापूर्वीही मी लोकप्रतिनिधी म्हणून मांडत आलो आहे, यापुढेही त्यांच्या उन्नतीसाठी संघर्ष करेन. जय मल्हार.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MLA Atul Bhatkhalkar apologize  over his statement regarding Khatik word news updates.

ठाकरे सरकारला लक्ष करताना ‘कसाई’ ऐवजी ‘खाटीक’ असा शब्द वापरला | टीका होताच भातखळकरांचा माफीनामा