मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र भाजपने नव्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार होऊन मंत्रीपदी विराजमान झालेले रावसाहेब दानवे सध्या दिल्लीच्या राजकारणात गेल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वरानी लागली आहे तर मुंबई शहराच्या अध्यक्ष पदाची माळ मंगलप्रभात लोढा यांच्या गळ्यात पडली आहे.
दरम्यान थोड्या वेळापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, काहीवेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच मंगल प्रभातलोढा यांना मुंबई भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra. pic.twitter.com/Qoa8R3VBqX
— ANI (@ANI) July 16, 2019
स्वच्छ प्रतिमा आणि संघटनेत केलेलं काम यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडे जवाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात असलं तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने ते त्यांच्या अधिक विश्वासातील असतील आणि त्यामुळेच त्यांना हे पद दिलं गेलं असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे. राज्यात आता काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता लगेच भाजपने ही निवड जाहीर केली आहे.
