20 April 2024 7:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | पुढे पुढे पाहा काय होतंय - आदित्य ठाकरे

Environment minister Aaditya Thackeray, Renaming, Auragabad, Sambhajinagar

औरंगाबाद, १६ जानेवारी: औरंगाबाद संभाजीनगर वादावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करणार का?; असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सूचक विधान केलंय. पुढे पुढे पाहा काय होतंय..! महाविकास आघाडीचं एकमत करूनच आम्ही शहराचं नाव बदलू, पण त्यासोबतच शहराच्या विकासाचे प्रश्नही आम्ही सोडवत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यावेळी ते बोलत होते. दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल वारंवार बोलत असतात पण त्यांनी या शहराच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षात काय केलं ते सांगावं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

दुसरे पक्ष संभाजीनगरबद्दल विचारत असतात, पण त्यांनी पाच वर्षे केलं काय.? असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करत आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला. देशात भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे जो कोविडच्या काळातही राजकारण करत होता.

 

News English Summary: This is the first time that Environment Minister Aditya Thackeray has publicly reacted to the Aurangabad Sambhajinagar controversy. Will Aurangabad be renamed Sambhajinagar ?; When asked this question by journalists, Environment Minister Aaditya Thackeray made a suggestive statement. Let’s see what happens next ..! We will change the name of the city only by agreeing with the Mahavikas Aghadi, but at the same time we are solving the problems of the development of the city, said Aaditya Thackeray.

News English Title: Environment minister Aaditya Thackeray talked on renaming Auragabad to Sambhajinagar news updates.

हॅशटॅग्स

#AadityaThackeray(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x