जालना : एका शेतकऱ्याची ही वेदना आहे जालन्यातील. त्या शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या फुलकोबीच्या विक्रीतून साधा वाहतुकीचा खर्च सुद्धा हाती लागणार नसल्याने त्याने स्वतःच जीव ओतून पिकवलेल्या शेतातील फुलकोबीवर फावडा फिरवत संपूर्ण पीक उध्वस्त केलं.
जालना तालुक्यातील पाचेगाव येथे राहणाऱ्या या शेतकऱ्याच नाव आहे प्रेमसिंग चव्हाण. या शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या फुलकोबीच्या विक्रीतून साधा वाहतुकीचा खर्च सुद्धा हाती लागणार नसल्याने प्रचंड रागाच्या भरात संपूर्ण फुलकोबीची शेतीच फावड्याने उध्वस्त करून टाकली.
हा शेतकरी केलेल्या उत्पादनातून आणि मातीमोल भावातून साधा प्रवासाचा खर्च सुद्धा मिळवू शकणार नव्हता म्हणून अखेर हवालदिल झालेल्या या शेतकऱ्याने रागाने संपूर्ण फुलकोबीवर फावडा फिरवला. त्यांचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांच्या व्हायरल होत आहे.
या आधी त्याने टोमॅटो पिकवला होता तेंव्हा सुद्धा हीच परिस्थिती त्याच्यावर उद्भवली होती. शेतमाल भाव मिळतच नसल्याने शेतकरी मात्र पुरता बेजार झालेला पाहावयास मिळत आहे.
