25 March 2025 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई, शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS
x

मुस्लिम मतं मिळत नसल्याने MIM'ला फक्त ८ जागा; वंचित आघाडी तुटणार? सविस्तर

MIM, Vanchit bahujan Aghadi, Prakash Ambedkar, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारत मते मिळवित चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीचं आगामी विधानसभा निवडणुकीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडी यांना लोकसभा निवडणुकीत लाखांच्या पुढे मतदान झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत.

एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन औवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदारांना एकत्र आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमने औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत यश मिळवित राज्यात पहिले खाते उघडले. मात्र प्रकाश आंबेडकर यांना अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमच्या आघाडीनं भल्याभल्यांना घाम फोडला. इतकंच नाही तर औरंगाबादच्या रुपानं एक खासदारसुद्धा त्यांना मिळाला, या आघाडीनं राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची धुळधाण उडवली, मात्र हीच आघाडी आता तुटल्यात जमा आहे, कारण एमआयएमनं वंचित बहुजन आघाडीला सुरुवातीला १०० जागांची मागणी केली होती, त्यानंतर ही मागणी ७५ वर आली त्यानंतर अगदी ५० वरही एमआयएम तयार झाली, मात्र आंबेडकरांनी या सगळ्यांच मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार आंबेडकरांनी एमआयएमला फक्त ८ जागा देवू केल्या आहेत, त्यापेक्षा जास्त जागा मिळणार नाही असंही त्यांनी एमआयएमला कळवलं आहे. यामुळं एमआयएम मात्र चांगलचं संतापलं आहे. ८ जागांचा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. आठवडा भरापूर्वी ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात बैठक झाली होती, तिथंही आंबेडकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती अशी माहिती मिळते आहे. त्यात सध्य़ा तरी याबाबत एमआय़एम संयमी भूमिका घेत आहे, एमआय़एम प्रदेशअध्यक्ष तर आम्हाला काहीच माहिती नाही असं सांगून वेळ कानावर हात ठेवत आहेत.

त्यामुळे भारिपला मुस्लिम मतांचा फायदा होत नसल्याचं प्रकाश आंबेडकरांचे मत बनले आहे. मुस्लिम मतदार एमआयएम नव्हे मौलानांच्या प्रभावाखाली असल्याची आंबेडकरांना वाटतं. तर एमआयएमला राज्यातील विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्याची अपेक्षा आहे त्यामुळे एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी 98 जागांची मागणी केली आहे तर वंचितने एमआयएमला फक्त ८ जागांची ऑफर दिली आहे.

मागील वेळी आम्ही एकटे २४ जागांवर लढलो त्यामुळं इतक्या कमी जागा लढणार नाही अशी एमआयएमची ठाम भूमिका आहे, त्यात आंबेडकर ऐकायला तयार नाही असं कळतंय, तर आंबेडकरही याबाबत सध्या स्पष्ट बोलायता तयार दिसत नाही, काँग्रेससोबतची बोलणी झाल्यावर एमआयएमचं पाहू अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MIM(30)#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या