कुलगुरू, युसीजीसोबत चर्चा करूनच परीक्षा रद्द केल्या, ATKT'च्या विद्यार्थ्यांनीही दिलासा - उदय सामंत

मुंबई, ९ जुलै: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
उदय सामंत यांनी सांगितलं की, या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातील सर्व कुलगुरू आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संचालक यांच्यासोबत परीक्षांसदर्भात चर्चा केली. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत येणार नाही, अशा प्रतिक्रिया कुलगूरू आणि शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यूजीसीसोबत पत्रव्यवहार करुनच राज्य सरकारने अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, असंही सामंत यांनी यावेळी नमूद केलं.
उदय सामंत पुढे म्हणाले की, “अनेक लोकांनी मी यूजीसीला पत्र का लिहिलं असा प्रश्न विचारत आकांडतांडव केलं. मी 17 मे रोजीच यूजीसीला अंतिम परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्यातील सर्व कुलगुरुंसोबत चर्चा केली. मी अनेक तज्ज्ञांशीही बोललो. त्यांनी परीक्षा न घेण्याबाबतच मत नोंदवलं. यानंतर आपतकालीन समितीची देखील बैठक झाली. यात अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत देखील यूजीसीला पत्र देण्यात आलं.”
युसीजने सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सप्टेबरपर्यंत परिस्थिती आणखी बिघडल्यास पुढचा निर्णय घेण्यात येईल, असं सांगून संभ्रम निर्माण केला आहे. मुळात सप्टेंबर अखेरपर्यंत परीक्षा घेता येणार नाहीतच. मात्र सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना संभ्रमातच ठेवायचं का असा सवालही सामंतांनी उपस्थित केला.
“त्यानंतर कुलगुरू ठरवतील त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं शासनानं ठरवलं. समितींनं ६ मे रोजी आपला अहवाल सादर केला. त्यानंतर आम्ही राज्यपालांशी यासंदर्भात चर्चा केली आणि ८ मे रोजी शासनानं समितीचा अहवाल स्वीकारला. त्यानंतर १७ मे रोजी मी यूजीसीला अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची केली. व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातही पत्रव्यवहार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
News English Summary: The University Grants Commission (UGC) has issued an order to take it by the end of September of the final year. However, as per the decision given by UGC, it is impossible to conduct the exam in Maharashtra till September, said Uday Samant, Minister of State for Higher and Technical Education in a press conference.
News English Title: Minister Uday Samant Speaks About Final Year Atkt Ekams In Maharashtra Ugc Decision Mumbai Press Conference News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Advance Tax | तुम्ही ऍडव्हान्स टॅक्सच्या पहिला हप्ता भरला का? | ही तारीख चुकल्यास महागात पडेल
-
Mangal Rashi Parivartan | 27 जूनला मंगळ मेष राशीत प्रवेश करेल | १२ राशींवर काय परिणाम होईल जाणून घ्या
-
Gold ETF Investment | हा गोल्ड फंड 64 टक्के परतावा देत संपत्ती वेगाने वाढवतोय | तुम्ही गुंतवणूक केली आहे का?
-
Agneepath Scheme | सीमेवर देशासाठी सेवा बजावणं सुद्धा कंत्राटी नोकरीचा प्रयोग? | देशभर मोदी सरकारविरोधात रोष
-
Business Idea | गुंतवणूक न करता हा व्यवसाय सुरु करा | महिन्याला 50,000 रुपयांची कमाई
-
LIC Share Price | एलआयसीचे मार्केट कॅप 1 महिन्यात 31 टक्क्याने खाली | सामान्य गुंतवणूकदार पूर्ण फसला
-
Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले
-
Agnipath Scheme | मोदी सरकार अग्निपथ योजनेवर ठाम | उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास संधी मिळणार नाही
-
Investment Tips | तुम्ही शॉर्ट टर्ममध्येही चांगला पैसा कमवू शकता | गुंतवणुकीच्या या ट्रिक फॉलो करा
-
5G Internet in India | तुमच्या इंटरनेट स्पीडमध्ये 10 पटीने वाढ होणार | ऑनलाईन उद्योगांनाही गती येणार