महत्वाच्या बातम्या
-
भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार | पण प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास | अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. काल (११ जून) संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार | आता विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स अनिवार्य | ब्रीज कोर्स म्हणजे काय?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.
4 वर्षांपूर्वी -
सध्या कोणतीही चर्चा नाही, पण भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत जयंत पाटलांची सुद्धा उपस्थिती | लोकसभेत महाविकास आघाडी फॉर्म्युला?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आणि उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि मोदी विरोधी वातावरण झाल्याचे संकेत मिळताच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाला त्यांनी केक जास्त खाल्ला असेल | पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आतमध्ये येऊनच दाखवा - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
सर्वोच्य धक्का | सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची याचिका फेटाळली
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्य न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सर्वोच्य न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा दिलासा मानला जात आहे.सर्वोच्य न्यायालयानं तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात वर्ष काम करत आहेत. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०२४ | मोठी रणनीती आखली जातेय | आज प्रशांत किशोर पवारांची भेट घेणार
प्रत्यक्ष मोदींना सत्तेत आणण्यासाठी महत्वाची रणनीती आखणारे प्रशांत किशोर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल ते दिल्लीमध्ये भाजपच्या रणनीतीला धोबीपछाड देणारे प्रशांत किशोर सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर आता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात मृत्यूंच्या आकडेवारीत तफावत? | नाही, उलट दैनंदिन तांत्रिक अडचणींमुळे आकडा अधिक दिसतोय - सविस्तर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य अनलॉक होत असताना कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू आणि दैनंदिन मृत्यूच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यावर मृत्यू लपवण्याचे आरोप करत असले तरी प्रत्यक्षात जास्तीचे मृत्यू दाखवण्याचा प्रकार समोर आला. यात प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा सरकारने २५१८ अधिक मृत्यू दाखवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्य सरकार कोरोनाबाबत लपवाछपवी करत नसून सर्वकाही पारदर्शी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, राज्य सरकार व आरोग्य विभागाकडून दररोज कोरोनाबाबतची सविस्तर आकडेवारी जारी केली जाते. ही दोन्ही आकडेवारी तपासल्यास मृत्यूसंख्येत मोठा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार आकडेवारी लपवतंय असं म्हणण्यापेक्षा माहिती संकलित करण्याच्या त्रुटीतून उलट जास्त मृत्यू दाखवले जातं आहेत असं समोर येतंय. त्यामुळे विरोधकांचा दावा देखील फोल ठरतोय.
4 वर्षांपूर्वी -
हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी
केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं निश्चित
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलं आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार - राज्य सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार
पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत आहे. गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाणार आहे. तशी माहिती एकनाीथ शिंदे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
१०'वीच्या विद्यार्थ्यांचा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होण्याचे संकेत
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी | गटार स्वच्छ आहे की नाही याची खात्री करण्यासाठी स्वतः गटारात उतरल्या
भिवंडी महानगरपालिकेच्या महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांचे सध्या सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे. कारण ही तसेच आहे. महिला अधिकारी असलेल्या सुविधा चव्हाणने गटार स्वच्छ आहे की नाही? हे पाहण्यासाठी चक्क गटारात उतरल्या. तपासणीदरम्यान, त्यांना स्वच्छतेच्या कामावर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी एका शिडीच्या साह्याने गटारीत उतरत पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना अपेक्षेप्रमाणे स्वच्छता पाहायला मिळाली. पण अनेक ठिकाणी मात्र घाण दिसल्याने त्यांनी संबंधित आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले.
4 वर्षांपूर्वी -
बीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे MIDC उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल आणि आगामी लोकसभा, विधानसभा सुद्धा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात झालेल्या संवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच बोलले आहेत. ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय.
4 वर्षांपूर्वी -
मोर्चा सुद्धा आणि टेक्निकली डोकं लावून पुढची भूमिका, पहिली जबाबदारी माझी | आंदोलनाची टॅगलाईन असेल...
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून लोकशाही मोडून काढण्याच प्रयत्न | पत्रकारितेची अवस्था सुद्धा गंभीर - अजित पवार
केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL