महत्वाच्या बातम्या
-
मला कुणी शिकवण्याची गरज नाही | फडणवीस बोलले तरच उत्तर देईन - संभाजीराजे
खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांतदादांना सुनावलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक | भाजप कार्यकर्त्याने मुंबई भाजप अध्यक्षांची लायकीच काढली
भारतीय जनता पक्षात एकाबाजूला सत्ता गेल्यापासून आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यात दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना मुंबई भाजपचे वरिष्ठ नेते अपमानास्पद वागणूक देत असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे भाजपला याचा भविष्यात फटका देखील बसू शकतो.
3 वर्षांपूर्वी -
सातारा | भाजप नगरसेविकेची पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि गळा चिरण्याची धमकी | Audio क्लिप व्हायरल
सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरुन राडा सुरु आहे. यावरुन सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगाराला झापलं. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ करून गळा चिरून टाकेन, अशा धमकीची ऑडिओ क्लिप साताऱ्यात आणि समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगालमध्ये ममता पुन्हा येणार नाहीत म्हणणारे फडणवीस म्हणाले '२०२४ मध्ये पुन्हा मोदीच'
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी तब्बल साडे तीन तास बैठक झाली. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला हाणलाय. कुणी कितीही रणनिती आखा, पण आताही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदीच असणार, अशा शब्दात फडणवीस यांनी पवार-किशोर भेटीवर प्रतिक्रिया दिलीय.
3 वर्षांपूर्वी -
संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार - भाजपने डिवचलं
ठाकरे सरकारने जेवढी ताकद आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर कोर्टात लावली, तेव्हढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली नाही, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथे बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका
राज्यात सध्या अनेक घान सुरु आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्षाचा महत्वाचा नेता आपला पक्ष वाढवण्यासाठी दौरे करत आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही विदर्भ दौऱ्यावर आहे. आज (१२ जून) नाना पटोले अमरावतीत असताना त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले आहे.येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार | पण प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास | अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. काल (११ जून) संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार | आता विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स अनिवार्य | ब्रीज कोर्स म्हणजे काय?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.
3 वर्षांपूर्वी -
सध्या कोणतीही चर्चा नाही, पण भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत.
3 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत जयंत पाटलांची सुद्धा उपस्थिती | लोकसभेत महाविकास आघाडी फॉर्म्युला?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आणि उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि मोदी विरोधी वातावरण झाल्याचे संकेत मिळताच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
3 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाला त्यांनी केक जास्त खाल्ला असेल | पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आतमध्ये येऊनच दाखवा - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
सर्वोच्य धक्का | सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची याचिका फेटाळली
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्य न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सर्वोच्य न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा दिलासा मानला जात आहे.सर्वोच्य न्यायालयानं तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात वर्ष काम करत आहेत. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०२४ | मोठी रणनीती आखली जातेय | आज प्रशांत किशोर पवारांची भेट घेणार
प्रत्यक्ष मोदींना सत्तेत आणण्यासाठी महत्वाची रणनीती आखणारे प्रशांत किशोर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल ते दिल्लीमध्ये भाजपच्या रणनीतीला धोबीपछाड देणारे प्रशांत किशोर सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर आता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं वृत्त आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात मृत्यूंच्या आकडेवारीत तफावत? | नाही, उलट दैनंदिन तांत्रिक अडचणींमुळे आकडा अधिक दिसतोय - सविस्तर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य अनलॉक होत असताना कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू आणि दैनंदिन मृत्यूच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यावर मृत्यू लपवण्याचे आरोप करत असले तरी प्रत्यक्षात जास्तीचे मृत्यू दाखवण्याचा प्रकार समोर आला. यात प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा सरकारने २५१८ अधिक मृत्यू दाखवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्य सरकार कोरोनाबाबत लपवाछपवी करत नसून सर्वकाही पारदर्शी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, राज्य सरकार व आरोग्य विभागाकडून दररोज कोरोनाबाबतची सविस्तर आकडेवारी जारी केली जाते. ही दोन्ही आकडेवारी तपासल्यास मृत्यूसंख्येत मोठा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार आकडेवारी लपवतंय असं म्हणण्यापेक्षा माहिती संकलित करण्याच्या त्रुटीतून उलट जास्त मृत्यू दाखवले जातं आहेत असं समोर येतंय. त्यामुळे विरोधकांचा दावा देखील फोल ठरतोय.
3 वर्षांपूर्वी -
हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी
केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं निश्चित
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलं आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार - राज्य सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार
पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत आहे. गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाणार आहे. तशी माहिती एकनाीथ शिंदे यांनी दिली.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला
- Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला
- Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता
- Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती?