महत्वाच्या बातम्या
-
पडळकरांनी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही - आ निलेश लंके
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर खालच्या शब्दात केली. ‘रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, अशा शब्दात त्यांनी पवारांवर टीका केली होती. शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी खालच्या दर्जाची भाषा केली होती. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकर म्हणाले होते. पवारांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते सध्या पडळकरांचा समाचार घेताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदा महाराष्ट्रात मंजूर होणार नाही | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान
शेतकरी विरोधी कोणतीही भूमिका घेऊन केंद्र सरकारने मंजूर केलेले बिल हे महाराष्ट्रात मंजूर केले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (गुरुवारी) सय्यद पिंपरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
आषाढी वारी झाल्यावर जगातील कोरोना नामशेष होईल | संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. याच कोरोनावर काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी एक विधान केलं आहे. पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार पडणार असे केंद्राला वाटत असेल तर ते अशक्य आहे
विरोधकांना राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे. संजय राऊत यांनी टीव्ही वृत्त वाहिन्यांशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून मंत्र्यांना अडचणीत आणून सरकार हलवू शकतो असं केंद्र सरकारला वाटत असेल तर ते कदापी शक्य नाही.
4 वर्षांपूर्वी -
विधानसभा अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? | संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, आमदार संग्राम थोपटे, के. सी. पडवी यांची नावे चर्चेत आघाडीवर आहेत. दिल्लीमध्ये संग्राम थोपटे आणि के सी पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे थोपटे राजकीय विरोधक मानले जातात. तर शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचे समजते. त्यामुळे विधानसभेचा अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेऱ्यात कैद
सोलापुरात घोंगडी बैठकीला आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले असून, पोलीस अज्ञात व्यक्तीचा तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दगडफेक करणारा युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुणे आंबिल ओढा प्रकरण | माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे - अजित पवार
काही दिवसापूर्वी पुणे महापालिकेने दांडेकर पुलानजीक असलेल्या आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण कारवाई केली होती. अतिक्रमण कारवाई दरम्यान वाद उफाळला होता. त्यावेळी पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांस टीकाटिपणी करू लागले. याच मुद्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा आणि माझा काय संबंध ? मला का बदनाम केले जात आहे, अशी विचारणा करीत या कारवाईत हस्तक्षेप नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी पवार हे मंगळवारी मुंबईतील एका बैठकीत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
पडळकर ही एक प्रवृत्ती आहे | भाजपमधील २-४ जणांचं मानसिक संतुलन ढासळलं - आ. अमोल मिटकरी
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. पवारांच्या दिल्ली बैठकांवरून त्यांनी पवारांवर जहरी टीका काली आहे. पवार हे मागील ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. परंतु, ‘रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या पत्रांचा राज्यपालांना विसर | राजभवन हे भाजपचं कार्यालय झालंय - नाना पटोले
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तर, राज्यपालांना 12 नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंजिनिअर व्हायचंय पण इंग्रजीचं टेन्शन? | काळजी नको, आता मराठी भाषेतून अभियांत्रिकी शिक्षण मिळणार
विद्यार्थ्यांसाठी आणि तीही विशेष करून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार भारतातील प्रादेशिक भाषेतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचं शिक्षण देण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाची परवानगी मिळाल्यानंतर मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ आणि पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात या अभ्यासक्रमांची सुरुवात होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन केले जाणार लसीकरण | पुण्यातून सुरुवात
राज्यात लसीकरणासाठी मोठ्या संख्येत लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. हे पाहता राज्य सरकारने आता घरोघरी जाऊन लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात पुण्यातून केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी लसी या केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे-मुंबई महापालिकांच्या निवडणुकीआधी भाजपची राजकीय घाई? | अजितदादा, अनिल परबांच्या CBI चौकशीची मागणी
राज्यातील महत्वाच्या मुंबई आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्याने मुंबईत शिवसेना आणि पुण्यात राष्ट्रवादी मोठी मजल मारण्याची शक्यता आहे. त्यात राज्यात अनेक महानगरपालिकेत आणि नगरपालिकेत भाजपाची सत्ता हातातून जातं असल्याने चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांच्या नेतृत्वाची चिंता वाढली आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेत शिवसेना सोबत असेल तर पुण्यात मोदी लाटेत आलेली सत्ता आता टिकवणं कठीण असल्याचं दिसतंय. परिणामी नेत्यांच्या बदनामीकडून पक्षाला बदनाम करण्याची व्यूहरचना आखली जातं आहे. मुंबई आणि पुणे महानगरपालिकेत पराभव झाल्यास चंद्रकांत पाटील यांची गच्छंती होईल अशी शक्यता असल्याने ते देखील चिंतेत असल्याचं भाजपच्या गोटातून समजलं.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला महाविकास आघाडीचा धक्का | सांगली, जळगाव पाठोपाठ भाजपने अहमदनगर महापालिका गमावली
याआधी अहमदनगर महापालिका निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. गतवेळी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी महापौरपदी बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता सांगली आणि जळगाव पाठोपाठ भारतीय जनता पक्षाने तिसरी महापालिका गमावली. अहमदनगर महानगरपालिकेतही महाविकास आघाडी पॅटर्न आल्याने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सिनियर PI, PSI आणि API पदावरील अधिकाऱ्यांच्या लवकरच मुंबई बाहेर बदल्या | 727 जणांची यादीही तयार
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस खात्यामध्ये ८ वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना काळातील आंदोलन ही दुर्दैवाची गोष्ट | राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा
कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नसताना आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टमुले तिसऱ्या लाटेचा धोका असताना राज्यात अनेक आंदोलनं झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून न्यायिक प्रक्रियेपेक्षा भाजप नेत्यांना सामान्य लोकांना भडकविण्याचा प्रयन्त केल्याचं आणि आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात नवी मुंबईमध्ये होऊ घातलेल्या विमानतळाच्या मुद्यावरून सर्व पक्षाच्या नेत्यांनी देखील आंदोलन केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
१-२ गुंठे जमिनींच्या तुकड्याचीही लवकरच दस्तनोंद | महसूल विभागाचे नोंदणी महानिरीक्षकांना पत्र - नक्की वाचा
जमिनीच्या छोट्या तुकड्यांच्या कायदेशीर नोंदणीकडे दुर्लक्ष केलं जातं. नागरी भागात, तसेच प्रमाणभूत क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याचा भंग होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयांतून एक-दोन गुंठे जमिनींचे व्यवहार नाकारण्यात येतात. परंतु, तुकडाबंदी कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व एकत्रीकरण याबाबत अधिनियम १९४७ मधील तरतुदी विचारात घेऊन अशा प्रकारच्या व्यवहारांचे दस्त नोंद करून घेण्यासंबंधीचे पत्र महसूल विभागाने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांना पाठवले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल - भास्कर जाधव
मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही पेटला आहे. याच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यांनी चांगलाच समाचार घेतलाय. आमच्या हाती सूत्र द्या, चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत नाही केलं तर राजकारणातून संन्यास घेईन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंताजनक | ऑनलाईन शिक्षणातून पैसा | बालभारतीच्या अॅप्लिकेशनसाठी पैसे मोजावे लागणार
कोरोना काळात शाळा बंद असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोरील समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र आता ज्या ऑनलाईन शिक्षणाच्या भरोसे पालक मुलांना अभ्यासात व्यस्त ठेवत आहेत त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या गरजेतून पालकांची लूट होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा | कोणत्या मुद्यावर चर्चा?
राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोडी घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा