मुंबई, ३० सप्टेंबर | राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. तर अनेक भागात चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

Rains have lashed many parts of the state. In many areas, the cyclone has damaged crops. Against this backdrop, MNS president Raj Thackeray has demanded the state government to declare a wet drought in the state :

राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र:
महाराष्ट्राच्या काही भागात मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक तर गेलेच आहे. पंरतु घरा-दाराचे नुकसानही फार झाले आहे. ही वेळ आणीबाणीची आहे. अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील. पंरतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला, शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तत्काळ द्यावी, असे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीने शेतकरी फार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासने आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे. प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल. परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पहाण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, याचा विचार करावा आणि सत्वर पावले टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Raj Thackeray wrote a letter to CM Uddhav Thackeray over flood effects in rural part of Maharashtra.

Raj Thackeray | पंचनामे होत राहतील, त्याआधी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा | राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र