24 April 2024 6:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

लवकरच भाजपमधून लोकं काँग्रेसमध्ये येतील: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat, Congress, BJP, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये जे काही घडलं आहे ते लक्षात घेता भाजपला सत्तेची हाव सुटली असल्याची टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. अन्य पक्षांतून लोक भाजपमध्ये जात आहेत. मात्र, लवकरच भाजपामधूनही लोक काँग्रेसमध्ये येतील, अशी भविष्यवाणी थोरात यांनी केली. विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे एकनाथ खडसे यांना भाजपने योग्य तो सन्मान दिला नाही. त्यांच्यासारखे अनेक जण भाजपमध्ये दुःखी आहेत. लवकरच ते आमच्याकडे येतील. दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेनंतर ही निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे, असं थोरात यांनी म्हटलं.

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीसाठी थोरात नाशिकमध्ये आले होते. पक्षाचे कार्यकर्ते लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाने नाराज आहेत. मात्र, त्यांची नाराजी दूर करून निवडणुकीत यश मिळवायचं आहे. यासाठी कार्यकर्ते नाराजी बाजूला ठेवून नव्या जोमाने काम करतील. वंचित बहुजन आघाडीवर भाष्य करताना आघाडीसाठी त्यांना पत्र पाठवलं आहे, असं थोरात यांनी सांगितलं.

राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे जनता ठरवेल. मग, भाजप-शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करतेच कशी, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. सध्या राज्यात दुष्काळ आहे मात्र सरकार यावर काहीच बोलत नाही आहे. स्वतःचा प्रचार करण्यासाठी यात्रा काढण्यातच मग्न आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x