27 July 2024 4:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खुशखबर! 35 हजार पगार असणाऱ्या खाजगी नोकरदारांना ग्रॅच्युइटी इतकी रक्कम मिळणार Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! जनरल कोट्यातून लोअर बर्थ सीट मिळवता येईल, माहित असणं गरजेचं आहे EPF Pension Money | 90% पगारदारांना माहित नाही, EPFO कडून 7 प्रकारच्या पेन्शन मिळतात, फायद्याची अपडेट Lakshmi Narayan Rajyog | लक्ष्मी-नारायण योग 'या' 3 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ, आर्थिक नशीब उजळवणार FD Investment Money | 1 वर्षाच्या रु.1,50,000 FD वर कोण अधिक रक्कम देईल? SBI, पोस्ट ऑफिस, HDFC की ICICI? Gold Rate Today | खुशखबर! सोनं खरेदीची योग्य वेळ, आज सोनं 5149 रुपयांनी स्वस्त झालं, भाव धडाम झाले Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल
x

परराज्यातील गरजू कामगारांसाठी राज्यात २६२ मदतकेंद्र सुरु; राहण्याची-जेवणाची सोय

Corona Crisis, Lock Down, Relief Camp for Migrants

मुंबई, २९ मार्च: केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाला लॉकडाऊनदरम्यान प्रवासी कामगारांना रोखण्यासाठी प्रभावीपद्धतीने राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान कॅबिनेट सचिव राजीव गोबा आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शहरांत आणि राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे.

कोरोना विषाणूमुळे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कामगारांनी आपले स्थलांतर सुरु केले आहे. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. कृपा करुन गोंधळून जाऊन मोठी चूक करु नका. जिथे आहात तिथेच थांबा. महाराष्ट्र सरकार तुमच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करेल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. गर्दी करुन नवीन संकट निर्माण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले होते.

मात्र त्यानंतर राज्य सरकारने अशा गरजूंसाठी संपूर्ण राज्यात एकूण २६२ मदतकेंद्र उभे केले आहेत. त्यामध्ये ७०३९९ परराज्यातील गरजू कामगारांच्या राहण्याची तसेच जेवण्याची सोय राज्य सरकारने केली आहे. त्यासंदर्भात अधिकृत ट्विट करत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.

 

News English Summary: Due to the corona virus, workers have started their migration not only in the state but all over the country. Everyone wants to go to their hometown. Please don’t be confused and make a big mistake. Wait wherever you are. Chief Minister Uddhav Thackeray has said that the Maharashtra government will facilitate you to stay and eat. He appealed to the crowd not to create a new crisis. However, since then the state government has set up 262 relief camp across the state for such needs. The state government has provided accommodation and meals to 70399 needy workers in the State. The Chief Minister’s Office has informed the official tweet.

 

News English Title: Story Relief camp has been started for migrants workers moving outside state during corona crisis lock down News latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x