मुंबई, ६ मे: कोरोना आपत्तीने साऱ्या जगाला संकटात टाकून अगदी वेगाने फोफावत असतानाच आता त्याचे थेट परिणाम हे जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ लागले आहेत. एकिकडे कोरोनावर मात कशी करायची हा प्रश्न असतानाच भारतासह अनेक राष्ट्रांपुढे आव्हान आहे ते म्हणजे मंदावलेल्या आर्थिक चक्राला पुन्हा गती देण्याचं.
राज्याचं चित्रही सध्या काही वेगळं नाही. याच परिस्थितीचा आढावा घेत आता अनेक राजकीय नेतेमंडळींनी सरकारला सल्ले देत या वित्तीय संकटातून कशा प्रकारे तरुन जाता येईल यासाठी जणू मार्गच दाखवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सरकारला या निर्णयावर विचार करण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, नोकर भरती रद्दच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार रहित पवारांनी राज्यातील युवांच्या दृष्टीने एक पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. यामध्ये कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा एज बार (वय मर्यादा संपूष्टात) होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो, असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने
यंदा नोकरभरती रद्द केली,पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा age bar होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल & याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो.— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2020
‘लॉकडाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा आणि आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये’ असा सल्लाही रोहित पवार यांनी तरुणांना दिला आहे.
लॉक डाऊन शिथिल होत असतानाच अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा व आजच्या संकटात कोणतंही काम कमी दर्जाचं समजू नये.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2020
News English Summary: While the Corona disaster is rapidly plaguing the entire world, its direct effects are now beginning to be felt in the global economy. On the one hand, the challenge for many nations, including India, on how to overcome the Corona, is to revive the stagnant economic cycle.
News English Title: Story this will provide jobs to the youth and manpower to the government suggested by NCP MLA Rohit Pawar News Latest Updates.
