
IRFC Share Price | भारत सरकारची मालकी असलेल्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSE:IRFC) शेअरमध्ये तेजीचे दिसत आहेत. मागील काही दिवस जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजार घसरला होता, पण IRFC शेअरमध्ये बुधवारी तेजी पाहायला मिळाली होती. बुधवारी शेअर 1.5% वाढला होता. IRFC कंपनीचा शेअरमध्ये मागील एका महिन्यात 8.5% घसरला आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.94 टक्के वाढून 152.85 रुपयांवर पोहोचला होता.. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश)
शेअरची 52 आठवड्यांची पातळी
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा शेअर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळीवरून 32 टक्क्यांनी खाली घसरला आहे. IRFC शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 65.75 रुपये होते. IRFC शेअरने दीर्घ आणि मध्यम कालावधीत गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे.
IRFC शेअर तेजीचे कारण काय?
सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने स्टॉक मार्केट एक्स्चेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ‘ कंपनीला २० बीओबीआर रॅक खरेदीसाठी 700 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. भारत सरकारच्या अखत्यारीतील रेल्वे मंत्रालयाच्या जनरल पर्पज वॅगन इन्व्हेस्टमेंट स्कीम अंतर्गत कंपनीला ही ऑर्डर प्राप्त झाली आहे. हे 700 कोटी रुपयांचे रॅक खरेदी केल्यानंतर त्याचा वापर राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळाच्या गरजा भागविण्यासाठी केला जाणार आहे असे एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे. दरम्यान, IRFC कंपनीने अजोय चौधरी यांची दोन वर्षांसाठी चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. या बातमीनंतर IRFC शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
IRFC कंपनीची आर्थिक कामगिरी
दरम्यान, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, ‘कंपनीच्या आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा आणि उत्पन्नात वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते. पहिल्या तिमाहीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न 1.65 टक्क्यांनी वाढून 1,576.8 कोटी रुपये झाले आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.